Keral Wayanad Rain : केरळच्या वायनाड या ठिकाणी निसर्गाचा रुद्रावतार कशाला म्हणतात ते पाहण्यास मिळालं आहे. प्रचंड पावसाने चारपेक्षा जास्त गावं होत्याची नव्हती झाली आहेत. भूस्खलन झालं आहे. ३०० हून अधिक लोकांचा बळी गेला आहे. तर ३०० हून जास्त लोक बेपत्ता आहेत. केरळमध्ये निसर्ग तांडव करत असताना अनेक हृदयद्रावक आणि थरारक घटना समोर येत आहेत. बचाव पथकातल्या जवानांनी प्राण पणाला लावून घनदाट जंगलातला एका गुहेत आसरा घेतलेल्या मुलांची सुटका ( Wayanad rescue ) केली आहे. चार दिवसांपासून ही मुलं अन्न, पाण्यावाचून या गुहेत होती. त्यांनी या गुहेचा आधार घेतला होता. या सगळ्यांना अथक मेहनत करुन बचाव पथकाच्या जवानांनी सोडवलं ( Wayanad rescue ) आहे. या जवानांचे मुलांसह आलेले फोटो व्हायरल झाले आहेत. यामागे त्यांची प्रचंड मेहनत आहे यात शंकाच नाही.
नेमकं काय घडलं?
कालेपट्टा भागातल्या जंगलात एक महिला मुलांना अन्न आणि पाणी मिळावं म्हणून भटकत असल्याचं वनाधिकाऱ्यांनी पाहिलं. तिची विचारपूस केल्यानंतर महिलेने जवानांना सांगितलं की गुहेत तिची चार मुलं आहेत. त्यापैकी एक तिच्या बरोबर होता. तर तीन मुलं गुहेत होती. ही मुलं १ ते ४ वर्षे या वयाची आहेत. यानंतर बचाव पथकाने ८ तासांच्या अथक परिश्रमांची शर्थ केली. या आदिवासी मुलांना त्यांनी गुहेतून सोडवलं आणि त्यांना आईसह सुरक्षित स्थळी नेलं. ही मुलं चार दिवस अन्नपाण्यावाचून होती. त्यामुळे ती जगण्याची शक्यता संपलेली असताना बचाव पथकाने ही कमाल ( Wayanad rescue ) करुन दाखवली.
पानिया समुदायाचं कुटुंब गुहेत अडकलं
वायनाडच्या पानिया समुदायातील हे कुटुंब गुहेत अडकलं होतं. गुहेच्या वरच्या भागाला दरी होती. या ठिकाणी पोहचण्यासाठी बचाव पथकाला साडेचार तासांहून अधिक वेळ लागला. बचाव पथकातले जवान हशीस यांनी सांगितलं की आम्ही गुरुवारी या मुलांच्या आईला भटकताना पाहिलं त्या महिलेने सांगितलं की तिची तीन मुलं अडकली आहेत. त्यानंतर आम्ही प्रयत्न करुन या मुलांना वाचवलं ( Wayanad rescue ) असं हशीस यांनी सांगितलं.
बचाव पथकाचे जवान हशीस यांनी काय सांगितलं?
पुढे हशीस यांनी असं सांगितलं की आम्ही जेव्हा अथक प्रयत्न करुन त्या गुहेजवळ पोहचलो त्यावेळी आम्ही पाहिलं की ही तीन मुलं खूप थकलेली होती. आम्ही आमच्याबरोबर जे अन्नपदार्थ घेतले होते ते त्यांना दिले. आम्ही त्यांची सुटका करण्यासाठी ( Wayanad rescue ) आलो आहोत हे त्यांना समजावून सांगितलं. या मुलांच्या अंगावर कापडी पट्टा बांधला त्यांना बरोबर घेऊन आम्ही निघालो. हशीस म्हणाले गु्हेत अडकलेली ही मुलं आणि त्यांचे वडील हा समाज एका विशेष वर्गाशी संबंध ठेवणारा आदिवासी समाज आहे. सहसा हे लोक इतर लोकांशी संवाद साधणं टाळतात. अशात या मुलांच्या आईने आम्हाला काय घडलं आहे ते सांगितलं त्यामुळे आम्ही या मुलांची सुटका करु शकलो. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिलं आहे.
© IE Online Media Services (P) Ltd