दिल्लीच्या जहांगीरपुरी भागामध्ये झालेल्या हिंसाचाराच्या मुद्द्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण सुरू झालं आहे. यासंदर्भात तपास यंत्रणांकडून कारवाई सुरू करण्यात आली आहे. यादरम्यान ऑल इंडिया मजलिसे इत्तेहादुल मुस्लिमीन अर्थात एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी टीका केल्यानंतर त्यावरून भाजपाचे केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी त्यावर प्रत्युत्तर दिलं आहे. ओवैसींमध्ये मोहम्मद अली जिनांचा डीएनए असल्याचं ते म्हणाले आहेत.

काय म्हणाले ओवैसी?

जहांगीरपुरी परिसरात झालेल्या प्रकारानंतर असदुद्दीन ओवैसी यांनी टीका केली आहे. “दिल्ली महानगर पालिकेनं केलेल्या कारवाईमुळे आणीबाणीच्या काळात दिल्लीच्या तुर्कमन गेटजवळ करण्यात आलेल्या कारवाईची आठवण झाली. इथल्या गरीब मुस्लिमांनी जिवंत राहाण्याची हिंमत केली, म्हणून त्यांना शिक्षा केली जात आहे”, असं ओवैसी म्हणाले होते.

Bhagwant mann
प्रदुषणाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री भगवंत मान यांचा पंतप्रधान मोदींना टोला; म्हणाले, “ते युक्रेनचं युद्ध थांबवू शकतात, मग…”
27th Rashibhavishya In Marathi Horoscope Today
27 October Horoscope : अचानक धनलाभ ते‌ वैवाहिक…
bjp and thackeray group united to work uday samant
पालकमंत्री उदय सामंत यांच्या विरोधात भाजपा आणि ठाकरे गट एकत्र काम करणार, बाळ माने-महाडिक-बनेंमध्ये बंद दाराआड चर्चा
The attack on Baba Siddiqui reverberated across the country Mumbai crime news
हत्येनंतर राजकीय वादळ; बाबा सिद्दिकी यांच्यावरील हल्ल्याचे देशभरात पडसाद
Baba Siddique Shot Dead at Bandra Mumbai Breaking News Updates in Marathi
Baba Siddique Shot Dead : बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “आम्ही कुणालाही…”
Prashant Pawar said that we have not come to campaign with flag of BJP in mahayuti
“भाजपच्या प्रचारासाठी आम्ही महायुतीत आलो काय ?” अजित पवार गटाच्या नेत्याने सुनावले
Hitendra Thakur, Rajiv Patil, Hitendra Thakur latest news,
प्रत्येकाला स्वत:ची मते असतात – हितेंद्र ठाकूर; राजीव पाटील पक्षांतराच्या मुद्द्यावर प्रतिक्रिया
What Pawan Kalyan Said?
Pawan Kalyan : ‘सनातन धर्मा’च्या रक्षणासाठी केंद्रीय कायदा हवा’, आंध्र प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची मागणी

जहांगीरपुरी हिंसाचार प्रकरणातील आरोपी अन्सारची ‘पुष्पा’ स्टाईल चर्चेत

“जर तिथलं बांधकाम अवैध होतं तर मग गेल्या ७ वर्षांपासून भाजपा सरकार झोपलं होतं का? तुम्ही एका समाजाला लक्ष्य करून त्यांची मालमत्ता उद्ध्वस्त केली आहे. गुन्हेगार कोण हे ठरवणारे तुम्ही कोण? ते न्यायालय ठरवेल. तुम्ही क्रूरतेचं प्रदर्शन करत आहात”, असं देखील ओवैसी म्हणाले आहेत.

“सगळं काही हिंदू विरुद्ध मुस्लीम असंच बघतात!”

दरम्यान, यावर टीका करताना गिरीराज सिंह यांनी ओवैसींमध्ये जिनांचा डीएनए असल्याचं म्हटलं आहे. “ओवैसींसारखे लोक सर्वकाही हिंदू विरुद्ध मुस्लीम याच दृष्टीने बघतात. ते असं करतात कारण त्यांच्यामध्ये जिनांचा डीएनए आह आणि ते फक्त शरिया कायदाच पाळतात. या देशाचा कायदा नाही”, असं गिरीराज सिंह म्हणाले आहेत.