दिल्लीत भाजपला मिळालेला विजय म्हणजे जनतेने पंतप्रधान मोदी यांच्या गेल्या तीन वर्षातील कारभाराला दिलेली पसंतीची पोचपावती आहे, असे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी सांगितले. दिल्लीतील महानगरपालिकांच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी अमित शहा यांनी म्हटले की, गेल्या तीन वर्षांपासून नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली भाजप विजयी घौडदौड करत आहे. यापूर्वी उत्तर प्रदेश , उत्तराखंड आणि मणिपूर विधानसभा निवडणुकीतही भाजपला विजय मिळाला होता. त्यानंतर आज दिल्लीच्या जनतेनेही भाजपच्या बाजूने स्पष्टपणे कौल दिला आहे. ही एकप्रकारे नरेंद्र मोदी यांच्या गेल्या तीन वर्षातील कारभाराला जनतेने दिलेली पसंतीची पोचपावती असल्याचे शहा यांनी म्हटले. यानिमित्ताने दिल्लीच्या जनतेने यापुढे नकारात्मक आणि नाटकी राजकारण खपवून घेतले जाणार नाही, हा संदेश दिला आहे. दिल्लीकरांनी भाजपच्या सकारात्मक, सर्वांना बरोबर घेऊन जाण्याच्या आणि विकासाच्या राजकारणाला कौल दिल्याचेही अमित शहा यांनी म्हटले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा