“दिल्लीच्या हातातील न्यायाचा तराजू हा खरा नसून चोर बाजारातला आहे हे उघड झाले,” अशी टीका ‘सामना’च्या अग्रलेखामधून शिवसेनेनं केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरोधात दाखल झालेले सर्व खटले सीबीआयकडे वर्ग करण्याच्या प्रकरणावरुन संजय राऊत यांनी टीका केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने त्यावरुन राऊत यांना फटकारल्यानंतर आज शिवसेना आक्रमक झाल्याचं पहायला मिळत आहे. मात्र आता या प्रकरणावरुन आणि टीकेवरुन भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी राऊत यांचं मानसिक संतुलन बिघडल्याचा टोला लगावलाय. भाजपाच्यावतीने त्यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवताना राऊत यांच्यावर सडकून टीका केली.

परमबीर सिंग प्रकरणातील याचिका सीबीआयकडे वर्ग करण्याच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती संजय किशन कौल आणि न्यायमूर्ती एम.एम.सुंदरेश यांच्या खंडपीठाने राऊत यांना फटकारलं होतं. “प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांची आम्हाला चिंता वाटत नाही. परवा महाराष्ट्र सरकारमधील एका व्यक्तीने असं वक्तव्य केलं की आता त्यांना न्यायालयाकडून योग्य न्याय मिळेल अशी अपेक्षा नाही. आम्ही हे वाचलं, पण या गोष्टींमुळे आम्हाला काही फरक पडत नाही. अशा वक्तव्यांची जागा आमच्यासाठी केराची टोपली आहे”, असे न्यायालयाने म्हटलं होतं.

What happens when you drink Clove lemon tea every day health news
दररोज एक कप लिंबू-लवंगयुक्त चहाचे सेवन करा अन् शरीरातील ‘हे’ बदल पाहा; तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
What Manoj Jarange Said?
Manoj Jarange : मनोज जरांगेंचं वक्तव्य, “धनंजय मुंडे रात्री दोन वाजता भेटले होते, वाल्मिक कराडही होता, सगळे पाया पडले आणि…”
What Narendra Modi Said?
PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींचं वक्तव्य, “नेहरू-इंदिरा गांधींपासून काँग्रेसच्या सरकारांमध्ये १२ लाखांवर ३ लाखांचा कर…”
Liver health 5 Fruits That Will Hydrate Your Liver And Keep It Running Smoothly
यकृत निरोगी ठेवायचं? यकृताच्या आरोग्याची चिंता सतावतेय? ‘ही’ फळे खा अन् टेन्शन विसरा!
jaideep ahlawat on nepotizam and alia bhatt
‘पाताल लोक’ फेम जयदीप अहलावतचे नेपोटिझमवर भाष्य; आलिया भट्टबद्दल म्हणाला, “त्यात तिची चूक काय?”
madhuri dixit reveals both sons having inherited love for cooking
“माझ्या दोन्ही मुलांना…”, माधुरी दीक्षितने पतीला ‘या’ गोष्टीचं दिलं श्रेय, आठवण सांगत म्हणाली, “अमेरिकेत असताना…”
Sanjay Raut Slam BJP
Sanjay Raut : शिवसेनेत ‘उदय’ होणार यावर राऊत ठाम, चंद्राबाबू आणि नितीश कुमारांच्या पक्षाबद्दलही केला मोठा दावा; म्हणाले, “यांच्या तोंडाला रक्त…”

मात्र आता यावरुन शिवसेनेनं, “न्यायाचा तराजू हलतो आहे व सत्याची गळचेपी सुरू आहे. अशा वेळेला न्यायालयांनी जनतेचा आवाज बनायला हवे. लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी न्यायालयांनाच पुढे यावे लागेल. एका विशिष्ट विचारधारेच्या परिवाराचा ‘गुलाम’ किंवा ‘प्रचारक’ म्हणून केंद्रीय तपास यंत्रणा व न्यायालयास स्वतःला जुंपून घेता येणार नाही. भारतीय घटना त्यांना तशी मान्यता देत नाही, पण आज हे सगळेच लोक बडे किंवा छोटे गुलाम बनून अंधभक्तीचा सूर आळवीत आहेत,” अशा कठोर शब्दांमध्ये टीका केलीय.

याच टीकेच्या पार्श्वभूमीवर चित्रा वाघ यांनी ही टीका म्हणजे राऊत यांचं मानसिक संतुलन बिघडल्याचं लक्षण आहे, असं म्हटलंय. तसेच सर्वोच्च न्यायालयाने या टीकेची दखल घेत कठोर कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केलीय. “केंद्र सरकारच्या हातात असलेला न्यायाचा तराजू म्हणजे चोर बाजारातून विकत आणल्याचं वक्तव्य शिवसेनेचे सर्वज्ञानी खासदार संजय राऊत यांनी केलंय. हे वक्तव्य म्हणजे त्यांचं मानसिक संतुलन बिघडल्याचं लक्षण आहे. या वक्तव्याची गंभीर दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने त्याच्यावर कडक कारवाई करावी, अशी मी मागणी करते,” असं चित्रा वाघ म्हणाल्या आहेत.

Story img Loader