“तेलंगणात सत्तेत आल्यावर मुस्लिमांचे आरक्षण रद्द करून टाकू”, अशी जाहीर घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली होती. यावरून एआयएमआयएमचे प्रमुख अससुद्दीन ओवैसी यांनी अमित शाह आणि भाजपावर टीकास्त्र सोडलं आहे. रेकॉर्डब्रेक महागाई आणि बेरोजगारी बोला असा खोचक सल्लाही ओवैसी यांनी अमित शाहांना दिला. आज त्यांनी ट्वीटरवर पोस्ट करत भाजपावर टीका केली आहे.

“ओवैसी ओवैसीचं रडगाणं किती दिवस चालणार आहे? फक्त डायलॉग मारत राहता. रेकॉर्डब्रेक महागाई आणि बेरोजगारीवरही कधीतरी बोला. तेलंगणात दरडोई उत्पन्न सर्वाधिक आहे. असे असतानाही येथील मुस्लिम आरक्षण काढून टाकण्याचे अमित शाह म्हणतात”, असं ट्वीट अससु्द्दीन ओवैसी यांनी केलं आहे.

iran supreme leader statement
इराणच्या सर्वोच्च नेत्याकडून भारतातील मुस्लिमांबाबत वादग्रस्त टिप्पणी; परराष्ट्र मंत्रालयानेही सुनावले खडे बोल; म्हणाले…
21st September Rashi Bhavishya & Marathi Panchang
२१ सप्टेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थीला बाप्पा करणार ‘या’…
Anyone embezzling in Anand Dighe's ashram should be thoroughly investigated
आनंद दिघेंच्या आश्रमात ज्यांनी चुकीचे कृत्य केले त्यांना……शिंदे सेनेच्या मंत्र्याने थेटच सांगितले…
giriraj Singh Rahul gandhi
“देशद्रोह्यांना आरएसएसची विचारधारा कधीच समजणार नाही”, राहुल गांधींच्या टीकेला भाजपाचे प्रत्युत्तर!
Petitioners against reservation of Maratha society claim in High Court Mumbai news news
मराठा समाजाचे मागासलेपण स्वयंघोषित; आरक्षणविरोधी याचिकाकर्त्यांचा उच्च न्यायालयात दावा
Mohammad Yunus advises Sheikh Hasina to avoid political statements on India Bangladesh relations
‘हसीना यांनी भारतात मौन बाळगावे! भारत बांगलादेश संबंधासाठी राजकीय विधाने टाळण्याचा मोहम्मद युनूस यांचा सल्ला
vijay wadettiwar criticized shinde govt
“…पण सत्ताधाऱ्यांच्या मनाला पाझर फुटत नाही”; धाय मोकलून रडणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ पोस्ट करत विजय वडेट्टीवारांचं टीकास्र!
pm narendra modi
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मागितली जाहीर माफी, शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी खेद व्यक्त करताना म्हणाले…

“तेलंगणात मुस्लिमविरोधी वक्तव्य करण्याशिवाय भाजपाकडे कोणतेही व्हिजन नाही. खोट्या चकमकी, हैदराबादमधील सर्जिकल स्ट्राईक्स, संचारबंदी, गुन्हेगारांना सोडणं हेच भाजपाकडून केलं जातं. तुम्ही तेलंगणाच्या लोकांचा इतका तिरस्कार का करता?” असा सवालही त्यांनी यावेळी विचाला आहे.

“जर शाह एससी, एसटी, ओबीसी आरक्षणाबाबत गंभीर आहेत, तर त्यांनी ५० टक्के आरक्षणाची कमाल मर्यादा काढण्यासाठी घटनेत बदल केला पाहिजे. मागास मुस्लिमांचं आरक्षण एम्पिरिकल डेटावर अवलंबून आहे. यासाठी सुधीर कमिशनचा अहवाल वाचा. जर तुम्हाला जमत नसेल तर इतर कोणाला तरी सांगा”, असंही अससुद्दीन ओवैसी म्हणाले.