सुधारित नागरिकत्व कायद्यावरून देशात गदारोळ सुरू आहे. कायद्याला होत असलेल्या विरोधानंतर हा कायदा मुस्लीमविरोधी नसल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीतील सभेत म्हणाले होते. त्यानंतर भाजपाचे पश्चिम बंगालचे प्रदेश उपाध्यक्ष चंद्रकुमार बोस यांनीच उलट सवाल करत कोंडीत पकडलं आहे. सुधारित नागरिकत्व कायद्याचा धर्माशी संबंध नाही, तर मुस्लीम वगळून इतर धर्मांचा उल्लेख का करता आहात?, असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.

सुधारित नागरिकत्व कायद्यावरून देशभरात संभ्रमाचे वातावरण आहे. देशातील इतर भागासह पश्चिम बंगालमध्ये एनआरसी आणि सीएए कायद्यावरून तृणमूल काँग्रेस आणि भाजपामध्ये तीव्र संघर्ष निर्माण झाला आहे. तृणमूल काँग्रेसनं दोन्ही कायद्याला विरोध केला असून, भाजपाकडून समर्थन केलं जात आहे.

PM narendra modi Chandrababu Naidu and Nitish kumar
तिरुपती लाडू भेसळ वाद आणि नितीश कुमारांकडून राम मंदिराचे कौतुक; भाजपाच्या मित्रपक्षांनीही रेटला हिंदुत्वाचा मुद्दा
29th September rashibhavishya in marathi
२९ सप्टेंबर पंचांग: भाग्याची साथ की आर्थिक घडी…
student wing agitation
‘वंचित’कडून महाविकास आघाडी समर्थक विचारवंत लक्ष्य
eknath shinde shivsena s leaders marathi news
शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांना सरकारी पदे; भाजप, अजित पवार गटाचे नेते दुर्लक्षित
it is not good for person holding post of Prime Minister visiting house of Chief Justice of country on occasion of Ganapati Puja
गोंदियाः ‘हे’पंतप्रधान नरेंद्र मोदींना शोभनीय नाही,कॉग्रेसचे चेनीथल्ला म्हणतात,‘मुख्य न्यायाधीशांच्या घरी…’
Sitaram Yechury pass away know about his important role in politics
येचुरींच्या जाण्याने आशावादाचा स्रोत गमावला!
Mahayuti, Shinde group leader,
महायुतीमध्ये मैत्रीपूर्ण लढतीची शक्यता, शिंदे गटाच्या नेत्याचे भाकित
gujrat bjp corporator allegation of misbehave
Gujarat : भाजपाच्या नगरसेविकाचा पक्षातील नेत्यावरच गंभीर आरोप; म्हणाल्या, “त्यांनी माझा हात पकडला अन् व्यासपीठावरून…”

दरम्यान, या कायद्यावरून पश्चिम बंगालमधील राजकीय संघर्ष टोकाला गेलेला असताना भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष चंद्रकुमार बोस यांनी थेट पक्षालाच सुनावलं आहे. या कायद्याचा धर्माशी संबंध नाही असं भाजपाकडून सांगितलं जात असून, बोस यांनी पक्षाच्या याच भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे.

बोस यांनी ट्विट केलं आहे. “जर CAA2019 कायदा कोणत्याही धर्माशी नाही, तर मग आपण हिंदू, शीख, बौद्ध, ख्रिश्चन, पारशी आणि जैन या धर्मांचा उल्लेख का करतो आहे? आपण मुस्लीम धर्माचा त्यात समावेश का केलेला नाही. चला पारदर्शक होऊ या,”अशा शब्दात बोस यांनी पक्षाची कानउघडणी केली आहे.

मोदी काय म्हणाले होते?

‘एनआरसी’विषयी असत्य माहिती पसरवण्यात येत असल्याचे भाष्य करत, मुळात ही कल्पना आधीच्या काँग्रेस सरकारचीच आहे, असं मोदी म्हणाले होते. सुधारित नागरिकत्व कायदा आणि ‘एनआरसी’बद्दल भारतीय मुस्लिमांनी भीती बाळगण्याचे कारण नाही. माझे विरोधक मला लक्ष्य करण्यासाठी लोकांना भडकावून देशात दुही माजवण्याचा प्रयत्न करत आहेत. मुस्लिमांना स्थानबद्धता छावण्यांमध्ये (डिटेन्शन सेंटर्स) पाठवण्यात येईल, अशी अफवा काँग्रेस, काँग्रेसचे मित्रपक्ष आणि शहरी नक्षलवादी पसरवत असल्याचा आरोप मोदी यांनी केला होता.