विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जाण्यासाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना इतका वेळ लागत आहे त्यावरून जद(यू) आणि राजदमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचे संकेत मिळत आहेत, असा हल्ला भाजपने सोमवारी चढविला.
राजदचे नेते लालूप्रसाद यादव आणि त्यांचे कुटुंबीय कन्येच्या विवाहाचे कारण देऊन नितीशकुमार यांच्या शपथविधी समारंभापासून दूर राहिले. यावरूनच दोन्ही पक्षांमध्ये सर्व आलबेल नाही हे सिद्ध होते, असे भाजपचे ज्येष्ठ नेते सुशील मोदी यांनी म्हटले आहे.
माजी मुख्यमंत्री जितनराम मांझी यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर तीन दिवसांतच विश्वासदर्शक ठराव मांडला होता. स्वत: नितीशकुमार यांनी २०१० मध्ये पाच दिवसांत विश्वासदर्शक ठराव मांडला होता. मात्र आता नितीशकुमार यांना १६ मार्चपूर्वी बहुमत सिद्ध करावयाचे आहे, तीन आठवडय़ांहून अधिक कालावधी आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा