भाजपा खासदार वरूण गांधी यांनी उत्तर प्रदेशच्या पीलिभीतमध्ये बोलताना महात्मा गांधींची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेविषयी परखड भूमिका मांडली आहे. यासोबतच, आपल्याच पक्षाच्या केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. वरूण गांधी गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने केंद्रातील भाजपा सरकारवर वेगवेगळ्या मुद्द्यांवरून टीका करत आहेत. निरनिराळ्या सरकारी संस्थांच्या खासगीकरणावरून देखील त्यांनी केंद्राला सुनावलं आहे. या मुद्द्यावरून भाजपातील वरीष्ठ नेत्यांचा रोष देखील त्यांना पत्करावा लागला आहे.

पीलिभीत या आपल्या मतदारसंघात वरूण गांधींनी सोमवारी अंगणवाडी सेविका आणि इतर महिला कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी “मी इथे काही मुख्यमंत्र्यांना किंवा पंतप्रधानांना निवेदन देण्यासाठी आलेलो नाही, मी देशाचं राजकारण करायला आलो आहे”, असं सांगत उत्तर प्रदेश सरकारच्या धोरणांवर देखील निशाणा साधला. वेतन, कामाबाबतच निश्चिती अशा काही मूलभूत मागण्यांसाठी या महिला कर्मचारी आंदोलन करत आहेत.

MLA Hiraman Khoskar, Political journey Hiraman Khoskar, Hiraman Khoskar marathi news,
पवार ते पवार असा आमदार हिरामण खोसकर यांचा राजकीय प्रवास
ankita walawalkar aka kokan hearted girl first told to raj thackeray about her marriage
“लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर…
dhangar reservation issue
आरक्षणाच्या मुद्द्यावरून धनगर समाज आक्रमक; आंदोलकांनी मंत्रालयाच्या दुसऱ्या मजल्यावरून सुरक्षा जाळीवर मारल्या उड्या
Ajit Pawars trusted Bhausaheb Bhoir rebelled deciding to contest Chinchwad elections independently
चिंचवड : अजित पवारांच्या पक्षातून बंडखोरी; ‘या’ नेत्याने केला अपक्ष लढण्याचा निर्धार
Shambhuraj Desai, Uddhav Thackeray,
चुकीच्या लोकांच्या संगतीमुळे उद्धव ठाकरे दबावाखाली, मंत्री शंभूराज देसाई यांचा टोला
BJP questioned Rahul Gandhi after a corruption case was filed against Siddaramaiah
सिद्धरामय्यांच्या पाठीशी राहणार का?भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल झाल्याने भाजपचा राहुल गांधी यांना सवाल
Haryana BJP President Mohan Lal Badoli and Mandi MP Kangana Ranaut
Kangana Ranuat : “कंगना रणौत बरळत असतात, पक्षाची भूमिका…”, कृषी कायद्याबाबत केलेल्या विधानावरून भाजपा नेत्यांनीच टोचले कान!
farmer leader raju shetty slam bjp over corruption issues in buldhana
राजू शेट्टी म्हणाले; महाराष्ट्र भाजपला आंदण दिलेला नाही; काचेच्या घरात राहणाऱ्यांनी…या शेतकरी नेत्याने थेटच….

“आपण हिंदुस्थानला कमकुवक करत आहोत”

“आज माझ्यासमोर आख्खा देश बसला आहे. माझ्यासमोर ना कुणी हिंदू आहे ना कुणी मुसलमान, ना कुणी पुढारलेला आहे, ना कुणी मागास. असा भेद करून आपण हिंदुस्थानला कमकुवत करत आहोत. मी इथे तुमचा मुद्दा फक्त देशाच्या संसदेत मांडण्यासाठी आलेलो नाही. मुख्यमंत्री किंवा पंतप्रधानांना निवेदन देण्यासाठी देखील आलेलो नाही. तेही मी करीन, पण इथे मी आलोय ते तुम्हाला सांगायला की मी या आंदोलनामध्ये तुमच्या सोबत आहे”, असं वरूण गांधी यावेळी म्हणाले.

“आता जय हिंद म्हणण्याची वेळ आलीये”

दरम्यान, यावेळी बोलताना वरुण गांधी यांनी महात्मा गांधींच्या मारेकऱ्याचा जयघोष करणाऱ्यांना फाशी दिली पाहिजे, असं देखील म्हणाले. “महात्मा गांधींच्या जयंतीच्या दिवशी गोडसे जिंदाबाद बोलणाऱ्या लोकांना फाशी दिलं पाहिजे. आता जय हिंद म्हणण्याची वेळ आली आहे. भगवान राम मर्यादा पुरुषोत्तम होते. ज्यांनी लोकांना जोडण्याचं काम केलं. गांधीजींच्या जयंतीच्या दिवशी सोशल मीडियावर गोडसे जिंदाबाद ट्रेंड होत होता. आपल्याला एक हिंदुस्थान करायचा आहे. सरकार कुणाचं आहे, याची मला फिकीर नाही. मी तुमच्यासोबत आहे” असं वरूण गांधी यावेळी म्हणाले.

वरुण गांधींचा पुन्हा भाजपावर निशाणा; अटल बिहारी वाजपेयींचा जुना व्हिडीओ केला ट्वीट, म्हणाले…!

सर्व आंदोलकांच्या मागण्या सरकार दरबारी मांडण्याचं आश्वासन यावेळी वरूण गांधी यांनी दिलं.