लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : राज्यातील विधानसभा निवडणुकीत सावरकरांच्या मुद्द्यावरून आक्रमक होण्याची रणनीती भाजपने आखली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी व शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची कोंडी करण्याचा प्रयत्न यातून केला जाणार आहे. विरोधकांचा संविधानाचा मुद्दा निष्प्रभ करण्यासाठी सावरकरांच्या कथित अपमानाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आणला जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

Jammu and Kashmir assembly elections
नंदनवनातील निवडणूक: जम्मू-काश्मीरमध्ये उद्या मतदान, १० वर्षांनंतर विधानसभेसाठी निवडणूक
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Arvind Kejriwal latest marathi news
विश्लेषण: केजरीवाल यांच्या घोषणेने भाजपची अडचण? मुदतपूर्व निवडणुकीमागे आत्मविश्वास की जुगार?
Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar Bawankule : लोकसभेला महायुतीच्या काय चुका झाल्या? चंद्रशेखर बावनकुळेंचं मोठं विधान; म्हणाले, “आम्हाला अंदाजच नव्हता…”
Who is WWE Wrestler Kavita Dalal Julana Assembly seat election
Vinesh Phogat vs Kavita Dalal: विनेश फोगटच्या विरोधात उतरली सलवार सूटमधील कुस्तीपटू; निवडणुकीच्या आखाड्यात कुणाचा विजय?
AIMIM , Imtiaz Jaleel, constituency confusion,
इम्तियाज जलील यांच्यासह पाच उमेदवारांची एमआयएमकडून घोषणा, मतदारसंघाचा संभ्रम कायम
book Diary of Home Minister
सावधान ! अनिल देशमुख यांचे पुस्तक येत आहे, निवडणुकीपूर्वी येणार मोठे राजकीय वादळ
Ladki Bahin Yojana, women candidates, assembly elections, mahayuti, Eknath Shinde, Devendra Fadnavis, Nagpur, political pressure, maha vikas aghadi, Congress, BJP, women empowerment,
लखपती दीदी, लाडकी बहीण खूप झाले, उमेदवारीचे बोला! राजकीय पक्षांवर…

राज्यामध्ये विरोधकांकडून संविधान, महागाई-बेरोजगारी, जातनिहाय जनगणना आदी भाजपला अडचणीत आणणारे विषय राहुल गांधींकडून प्रचारामध्ये धडाडीने मांडले जाण्याची शक्यता आहे. हा झंझावात अडवायचा असेल तर त्यांना सावरकरांच्या मुद्द्यावरून घेरले जाऊ शकते. सावरकरांच्या मुद्द्यावरून भाजपने आक्रमक भूमिका घेतली तर महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या ठाकरे गटाचीही पंचाईत होऊ शकते. हा विचार करून भाजपमध्ये केंद्रीय स्तरावर रणनीती आखली जात असल्याचे समजते. ‘भारत जोडो यात्रे’मध्ये राज्यात बुलढाणा येथे झालेल्या जाहीरसभेत राहुल गांधींनी सावरकरांवर तीव्र टीका केली होती. ब्रिटिशांना सावरकरांनी माफीनामा लिहून दिला होता. त्यांनी बिटिशांची मदत केली होती. अशी कथित आक्षेपार्ह टिप्पणी राहुल गांधींनी केली होती. लंडनमधील भाषणामध्येही त्यांनी सावरकरांविरोधात विधाने केली होती. या विधानांविरोधात सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी मानहानीचा गुन्हा दाखल केला असून पुणे न्यायालयात राहुल गांधींविरोधात खटलाही चालवला जात आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या वातावरणामध्ये हे सर्व प्रकरण राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा >>>UPSC Aspirant Letter to CJI : “आम्ही इथं नरकयातना भोगतो आहे”; दिल्लीतील कोचिंग सेंटरच्या घटनेनंतर यूपीएससीच्या विद्यार्थ्याचं सरन्यायाधीशांना पत्र!

सावरकरांच्या मुद्द्यावरून राहुल गांधींना माफी मागण्याची मागणी भाजपकडून तीव्र केली जाण्याची शक्यता आहे. मी सावरकर नाही, मी माफी मागणार नाही, अशी भूमिका राहुल गांधींनी लोकसभेमध्ये घेतली होती. मात्र सावरकरांचा अपमान राज्यातील जनता खपवून घेणार नाही, असा भावनिक प्रचार भाजपकडून केला जाऊ शकतो, असा दावा सूत्रांनी केला. उद्धव ठाकरे यांची शिवसेना महाविकास आघाडीचा भाग असली तरी सावरकरांबाबत राहुल गांधींची मते मान्य नसल्याचे ठाकरे यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत सावरकरांच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांनाही राहुल गांधींविरोधात भूमिका घेण्यास भाग पाडले जाऊ शकते, असे सूत्रांचे म्हणणे आहे.