नवी दिल्ली : मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी नव्या चेहऱ्याची निवड केली जाण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच बुधवारी भाजपच्या विजयी झालेल्या १२ पैकी १० खासदारांनी लोकसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यातील प्रल्हाद पटेल, दियाकुमारी, नरेंद्र तोमर आदींसह अनेक नेत्यांची नावे मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत आहेत.

मुख्यमंत्री निवडीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत केंद्रीय नेत्यांची पाच तास बैठक झाल्यानंतर पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनीही बुधवारी राष्ट्रीय महासचिवांची बैठक घेतली. मॅरेथॉन बैठका झाल्या असल्या तरी, अंतिम निर्णय घेण्यात आला नसल्याचे समजते.

Meeting with Rahul Gandhi today to review the election print politics news
निवडणुकीच्या आढाव्यासाठी राहुल गांधी यांच्याकडे आज बैठक
17th October Rashi Bhavishya In Marathi
१७ ऑक्टोबर पंचांग: धनसंपत्ती की प्रचंड यश, गुरुवारी…
Cabinet meeting Ajit pawar left Cm Eknath Shinde
Ajit Pawar: अजित पवारांची मंत्रिमंडळ बैठकीतून १० मिनिटांत एक्झिट, विजय वडेट्टीवारांना मात्र भलताच संशय; म्हणाले, “त्यांना बाजूला सारण्याचे…”
Raj Thackeray appeal, Raj Thackeray,
जिंकण्यासाठीच्या लढाईला तयार रहा, राज ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आव्हान
Eknath shinde influence on modi
विश्लेषण: मुख्यमंत्र्यांच्या प्रभावापुढे ठाण्यात भाजपची कोंडी? पंतप्रधान दौऱ्याचा काय सांगावा?
ajit pawar silence on udgir
उदगीर जिल्हा निर्मितीसाठी मंत्र्याच्या मागणीनंतरही अजित पवारांचे मौन
Prime Minister Narendra Modi Home Minister Amit Shah visit Thane district
मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात भाजपची मोर्चेबांधणी सुरू; पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांचा ठाणे जिल्हा दौरा
The ruling Shinde Pawar group and the Thackeray group also demand that the polls be held in a single phase
एकाच टप्प्यात मतदान घ्या! सत्ताधारी शिंदे, पवार गटासह ठाकरे गटाचीही मागणी; भाजप, काँग्रेसचे मात्र मौन

हेही वाचा >>> भविष्याची रणनीती लवकर निश्चित करावी; नितीशकुमार यांचे इंडिया आघाडीला आवाहन

संविधानाच्या अनुच्छेद १०१ (२) नुसार विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर १४ दिवसांच्या आत नवनियुक्त सदस्यांना विद्यमान खासदारकीचा राजीनामा द्यावा लागतो. त्यामुळे तीनही राज्यांमध्ये आमदारकीची निवडणूक जिंकणाऱ्या भाजपच्या १२ पैकी १० खासदारांनी लोकसभाध्यक्ष ओम बिर्लाच्या दालनात जाऊन राजीनामे सादर केले. राजस्थानच्या अलवरचे खासदार बाबा बालकनाथ व छत्तीसगडमधील खासदार व केंद्रीयमंत्री रेणुका सिंह हे दोघेही राजीनामा सादर करतील असे सांगण्यात आले. नरेंद्र तोमर, प्रल्हाद पटेल व उदय प्रताप सिंह यांना मंत्रीपदाचाही राजीनामा द्यावा लागेल.

मध्य प्रदेश, राजस्थान व छत्तीसगडमध्ये अनुक्रमे शिवराजसिंह चौहान, वसुंधरा राजे व रमण सिंह या ज्येष्ठ नेत्यांकडे पुन्हा मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यासंदर्भात भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने अजूनही निर्णय घेतलेला नाही. मोदींच्या निवासस्थानी मंगळवारी रात्री उशिरापर्यंत बैठक झाली. त्यामध्ये अमित शहा, जे. पी. नड्डा तसेच, बी. एल. संतोष आदी सहभागी झाले होते. शहा आणि नड्डा यांनी या तीनही राज्यांतील नेत्यांशी चर्चा केली.

राजस्थानमध्ये वसुंधरा राजेंसह दियाकुमारी, गजेंद्रसिंह शेखावत, अर्जुनसिंह मेघवाल आदींची नावे चर्चेत आहेत. तर मध्य प्रदेशमध्ये शिवराजसिंह चौहान यांच्यासह नरेंद्र तोमर, प्रल्हाद पटेल, ज्योतिरादित्य शिंदे, कैलास विजयवर्गीय यांच्या नावांची चर्चा केली जात आहे. छत्तीसगडमध्ये रमणसिंह यांच्यासह अरुण साव, रेणुका सिंह यांचीही नावे चर्चेत आहेत.

रेवंत रेड्डींचाही निरोप

तेलंगणामध्ये भावी मुख्यमंत्री रेवंत रेडडी यांनीही बुधवारी संसदेत येऊन खासदारकीची राजीनामा लोकसभाध्यक्ष ओम बिर्लाकडे सुपूर्द केला. रेवंत रेड्डी गुरुवारी हैदराबादमधील जाहीर समारंभात मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. काँग्रेसचे पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, संसदीय पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतल्यानंतर रेवंत रेड्डी यांनी संसदेत विविध पक्षांच्या खासदार सहकाऱ्यांचाही निरोप घेतला. त्यानंतर रेवंत रेड्डी यांनी नव्या महाराष्ट्र सदनामध्ये जाऊन प्रभारी माणिकराव ठाकरे यांचीही भेट घेतली.