उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला मोठा विजय मिळाला असून योगी आदित्यनाथ पुन्हा मुख्यमंत्री झाले आहेत. अशा स्थितीत भाजपाच्या विरोधात वातावरण निर्माण करूनही एवढा मोठा विजय कोणामुळे झाला, हाच प्रश्न सर्वांच्या मनात येत आहे. एका मुलाखतीदरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना हाच प्रश्न विचारला असता, त्यांनी याचं सविस्तर उत्तर दिलं.

एबीपी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत दिसलेल्या नितीन गडकरींना विचारण्यात आले की उत्तर प्रदेशमध्ये भाजपचा विजय कोणाचा आहे? हा योगीजींच्या लोकप्रियतेचा विजय आहे की मोदीजींच्या मार्गदर्शनाचा विजय आहे?, यावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, केंद्रातील भाजपा सरकारचे काम आणि युपीमध्ये योगी सरकारने केलेल्या कामाचा परिणाम म्हणजे भाजपाला एवढा मोठा विजय मिळाला आहे.

Maharashtra Kesari 2025 result Shivraj Rakshe prithviraj mohol Controversy
Maharashtra Kesari : एवढं ‘मोहोळ’ का उठलंय? राष्ट्रवादीच्या नेत्याचा कुस्तीत राजकारण शिरल्याचा आरोप; म्हणाले, “खरा जिंकला तो…”
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
delhi assembly elections 2025
लालकिल्ला : दिल्ली भाजपसाठी आणखी प्रतिष्ठेची!
Shivsena MLA Arjun Khotkar
Arjun Khotkar : “राजकीय भूकंप काय असतो हे आम्ही दाखवून देऊ”, अर्जुन खोतकरांचं मोठं विधान; कोणाला दिला इशारा?
बीड राष्ट्रवादीमध्ये अजितदादांच्या इशाऱ्यानंतर ‘साफसफाई’ होणार का ?
Namdeo Shastri On Dhananjay Munde
Namdeo Shastri : “भगवान गड धनंजय मुंडेंच्या भक्कमपणे पाठिशी”, नामदेव शास्त्री महाराज यांनी मांडली भूमिका
Devotee Angry on yogi adityanath and Narendra modi after stampede in maha kumbha mela
महाकुंभातील भक्त योगी-मोदींवर नाराज का?
lokmanas
लोकमानस: लोकशाही की एकाधिकारशाही?

नितीन गडकरी म्हणाले की, उत्तर भारतात कायदा आणि सुव्यवस्थेबाबत अनेक समस्या आहेत. योगीजींनी धाडस दाखवून गुंडांवर कारवाई केली. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचे राज्य प्रस्थापित झाले. लोकशाहीत कायद्याचा आदर आणि भीती नसेल, तर ती चांगली गोष्ट नाही. योगीजींनी कायदा आणि सुव्यवस्थेसाठी घेतलेल्या भूमिकेमुळे माता-भगिनींमध्ये विश्वास निर्माण झाला आहे.

केंद्रीय मंत्री म्हणाले की, “जात, धर्म, समुदायाच्या वर उठून लोकांचा कायद्यावर विश्वास आहे. सरकारने केलेल्या कामावर जनतेने विश्वास दाखवला. गंगा शुद्धीकरण, जलमार्ग, राष्ट्रीय मार्ग आदी कामे करून लोकांना दिलासा मिळाला, तर त्याचा फायदा सरकारला निवडणुकीत झाला आहे. २०२४ पूर्वी युपीचे रस्ते अमेरिकेच्या रस्त्यांसारखे होतील,” असे आश्वासन त्यांनी मुख्यमंत्री योगींना दिल्याचेही नितीन गडकरींनी सांगितले.

Story img Loader