पाटणा : देशातील विरोधी पक्षांच्या ऐक्याला गती मिळाली असून त्यामुळे भाजपला भीती वाटत आहे, त्यामुळे देशात लोकसभा निवडणुका नियोजित वेळेच्या आधीच होतील, अशी शक्यता बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी शुक्रवारी व्यक्त केली. संतोष सुमन यांच्या राजीनाम्यानंतर शुक्रवारी आमदार रत्नेश सदा यांचा बिहारच्या मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला. त्यावेळी राजभवन येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे भाकीत केले.

लोकसभा निवडणुका लवकर होतील असे नितीश कुमार यांनी यापूर्वीही बोलून दाखवले होते. आधी आपण थट्टेत बोललो असू, पण लवकर निवडणूक होण्याची शक्यता दाट आहे असे ते म्हणाले. सध्याच्या वेळापत्रकाप्रमाणे एप्रिल-मे २०२४ मध्ये लोकसभा निवडणुका होणार आहेत. मात्र, त्या पुढील वर्षीच होतील याची खात्री नाही, त्या आधीसुद्धा होऊ शकतात असे मत त्यांनी व्यक्त केले. त्यामुळे सर्व विरोधी पक्षांनी भाजपचा पराभव करण्यासाठी एकत्र आले पाहिजे असे आवाहन त्यांनी केले.

election officer absconded,
धाराशिव: विधानसभा निवडणूक २८ दिवसांवर, निवडणूक उपजिल्हाधिकारी फरार
27th Rashibhavishya In Marathi Horoscope Today
27 October Horoscope : अचानक धनलाभ ते‌ वैवाहिक…
Sanjay Kelkar Thane, Thane Shivsena support,
ठाण्यात संजय केळकर यांच्याकडून शिवसेनेला चुचकारण्याचा प्रयत्न
Who Left BJP Due to Ajit Pawar?
Laxman Dhoble : “अजित पवारांच्या त्रासाला कंटाळून मी भाजपा सोडतो आहे”, माजी मंत्र्यांची घोषणा! आता हाती घेणार तुतारी
mohan vankhande sangli
सांगली: वनखंडे यांच्या काँग्रेस प्रवेशानंतर भाजपबरोबर आघाडीतही अस्वस्थता
Shindes supporters in Navi Mumbai signaled their support for vijay Nahata
मुख्यमंत्र्यांसमोर नाईक विरोधाचा पाढा
Supporters urge Ajit Pawar to contest from Baramati Assembly Constituency pune print news
अजित पवारांनी बारामतीमधूनच लढण्याचा सर्मथकांचा आग्रह
BJP MLA Tanhaji Mutkule along with Shivaji Mutkule also applied for candidature from Hingoli Assembly Constituency print politics news
भाजप आमदार तान्हाजी मुटकुळे यांच्यासह मुलाचाही उमेदवारीसाठी अर्ज

मांझी यांच्यावर हेरगिरीचा आरोप बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि हिंदूस्तानी अवामी मोर्चाचे (एचएएम) संस्थापक नेते जितन राम मांझी हे महागठबंधनच्या घटक पक्षांवर हेरगिरी करत होते असा गंभीर आरोप नितीश कुमार यांनी केला. मांझी यांना २३ जूनला होणाऱ्या विरोधकांच्या बैठकीत सहभागी व्हायचे होते, मात्र ते बैठकीतील चर्चेचा तपशील भाजपला कळवतील अशी आपल्याला शंका होती. ते भाजपसाठी हेरगिरी करत होते, त्यांनी बाहेर पडणे हे महागठबंधनच्या भल्याचेच आहे अशी टिप्पणीही त्यांनी केली.