पीटीआय, लंडन

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताला कायमस्वरूपी सदस्यत्व मिळावे यासाठी ब्रिटननेही पाठिंबा दिला आहे. अमेरिका, फ्रान्स या देशांनी यापूर्वीच पाठिंबा दिला आहे. भारताला सदस्यत्व मिळाल्यास ही अधिक प्रातिनिधिक संस्था बनेल, असे ब्रिटिश पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी सांगितले.

america election date
बुलेटप्रूफ ग्लास ते पॅनिक बटण; अमेरिकेत सुरक्षित मतदानासाठी कोणत्या उपाययोजना करण्यात येत आहेत?
china biggest dam in the world
चीनमधील ‘या’ अवाढव्य धरणामुळे पृथ्वीचा वेग मंदावला? धरणाचा…
Vice President said Today we are in corruption free India
नागपूर : देशातून दलालांची जात संपूर्णपणे नष्ट, उपराष्ट्रपती धनखड म्हणतात,‘सरकारी नोकऱ्या…’
ex finance minister of j and k haseeb drabu on Article 370
अनुच्छेद ३७० रद्द करून कोणी, काय मिळवले? जम्मू-काश्मीरचे माजी अर्थमंत्री हसीब द्राबू यांचा सवाल
Ajit Pawar, NCP, Vidarbha, Ajit Pawar and Vidarbha,
Ajit Pawar : अजित पवारांच्या राष्ट्रवादीत विदर्भात धुसफूस, ‘हे’ आहे कारण
Pervez Musharraf land acqasition
पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती मुशर्रफ यांच्या भारतातील वडिलोपार्जित जमिनीचा लिलाव; शत्रू संपत्ती कायदा काय आहे?
Why did prakash ambedkar refrain from commenting on the BJP-Sangh coordinators question
भाजप-संघ समन्वयकाच्या प्रश्नावर आंबेडकरांनी भाष्य का टाळले?
pm modi pakistan visit
नेहरू ते मोदी; कोणकोणत्या पंतप्रधानांनी पाकिस्तानला भेट दिली? तेव्हा नक्की काय घडले? पंतप्रधान मोदी पाकिस्तानचे निमंत्रण स्वीकारतील का?

न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या महासभेतील आपल्या भाषणात स्टार्मर म्हणाले, जागतिक बहुपक्षीय प्रणाली अधिक प्रातिनिधिक आणि अधिक प्रतिसाद देणारी असल्याचे सुनिश्चित करण्यासाठी सुधारणा महत्त्वाच्या आहेत.भारत, आफ्रिका, ब्राझील, जपान आणि जर्मनी या देशांना कायमस्वरूपी प्रतिनिधित्व देण्याबरोबरच ब्रिटनने सुरक्षा परिषदेच्या निवडून आलेल्या सदस्यांसाठी अधिक जागांची मागणी केली.

हेही वाचा >>>Election Commission : आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाचं महाराष्ट्राला पत्र; ‘या’ विषयावर व्यक्त केली नाराजी!

पाकिस्तानी पंतप्रधानांकडून काश्मीरचा मुद्दा उपस्थित

पाकिस्तानने शुक्रवारी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला. काश्मीरमध्यील टिकाऊ शांतात सुरक्षित करण्यासाठी भारताने अनुच्छेद ३७० रद्द करण्याचा निर्णय मागे घ्यावा आणि काश्मीरप्रश्नी संवाद साधला पाहिजे, असे पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ म्हणाले. पॅलेस्टाईनच्या नागरिकांप्रमाणे जम्मू-काश्मीरच्या जनतेनेही त्यांच्या स्वातंत्र्यासाठी आणि आत्मनिर्णयाच्या अधिकारासाठी शतकानुशतके संघर्ष केला आहे, असे शरीफ म्हणाले. शांततेकडे वाटचाल करण्याऐवजी जम्मू-काश्मीरबाबत सुरक्षा परिषदेच्या ठरावांची अंमलबजावणी करण्याच्या आपल्या वचनबद्धतेपासून भारत दूर गेला आहे, असा आरोप शरीफ यांनी केला.

परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी संयुक्त राष्ट्रांचे (यूएन) सरचिटणीस अँटोनिओ गुटेरस आणि ‘यूएन’च्या सर्वसाधारण सभेचे नवे अध्यक्ष फिलेमॉन यांग यांची भेट घेतली. पश्चिम आशिया, युक्रेन आदी विषयांवर त्यांच्यात चर्चा झाल्या. यांग यांच्या ‘विविधतेत एकता’, ‘शांतता’ आणि ‘शाश्वत मानवता’ या मुद्द्यांना जयशंकर यांनी पाठिंबा दिला.