उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये बसने मिनी ट्रकला जोरदार धडक दिली आहे. या भीषण अपघातात १५ जणांचा मृत्यू झाला असून तर १० पेक्षा अधिक जण गंभीर असल्याची माहिती आहे. त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आग्रा-अलीगड राष्ट्रीय महामार्ग ९३ वर शुक्रवारी सायंकाळी हा अपघात घडला. मृतांमध्ये लहान मुले, महिला आणि पुरुषांचा समावेश आहे.

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, मिनी ट्रकमध्ये एकूण ३० प्रवाशी होते. हे सर्व खंदौलीतील सेवला गावचे रहिवासी असून मुकुंद खेडा येथे तेराव्यासाठी गेले होते. तिथून परतत असताना हा अपघात झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक निपुण अग्रवाल, जिल्हा दंडाधिकारी आशिष कुमार, सीओ हिमांशू माथूर पोलीस दलासह घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी बस चालकाला अटक करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Home Minister Amit Shah claims that there is no Article 370 in Kashmir again
काश्मीरमध्ये पुन्हा ‘अनुच्छेद ३७०’ नाहीच! गृहमंत्री अमित शहा यांचा दावा; भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध
15th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
१५ सप्टेंबर पंचांग: आनंदाची वार्ता ते प्रेम, मैत्रीची साथ; १२ पैकी कोणत्या राशीचा हसत-खेळत जाणार रविवार; वाचा तुमचे राशिभविष्य
Manipur Drone Attack
Manipur Drone Attack : मणिपूर हादरलं! माजी मुख्यमंत्र्यांच्या घरावर रॉकेट हल्ला; एकाचा मृत्यू, पाच जण जखमी
congress first list candidates out for haryana polls
Haryana Poll : विनेश फोगटची उमेदवारी जाहीर; ‘या’ मतदारसंघातून लढणार निवडणूक, काँग्रेसकडून पहिली यादी जाहीर
Omar Abdullah on Afzal Guru hanging
Omar Abdullah on Afzal Guru hanging: अफझल गुरूच्या फाशीबाबत ओमर अब्दुल्ला यांचे धक्कादायक विधान; म्हणाले, “आमच्या हातात असतं तर…”
Who is Jaydeep Apte in Marathi
Jaydeep Apte : जयदीप आपटेला पोलिसांनी हाक मारली, रडत गयावया करु लागला आणि म्हणाला; “मला…”
Narendra modi on Surat Loot
Surat Loot : सूरतेची महाराजांची लूट आणि मोदींचे १० वर्षांपूर्वीचे उद्गार… नक्की ऐका
Ramdas Kadam On Uddhav Thackeray
Ramdas Kadam : “उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं दोन तासांत आमदार परत आणतो; पण…”, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान

हेही वाचा – Woman Molested In Ambulance : रुग्णवाहिकेत महिलेचा विनयभंग, कर्मचाऱ्याने पीडितेच्या पतीचा ऑक्सिजन काढून घेतला अन्…

दरम्यान, या घटनेनंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. हाथरस येथील अपघात दुर्दैवी आहे. या अपघातात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांप्रती मी संवेदना व्यक्त करतो. तसेच जे जखमी आहेत, ते लवकर बरे व्हावे, यासाठी प्रार्थना करतो, असे ते म्हणाले. याशिवाय पंतप्रधान मोदी यांनीही या घटनेबाबत दु:ख व्यक्त केलं. हाथरसमधील अपघाताची बातमी ऐकून मन सून्न झालं आहे. मी या अपघातात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त करतो, असे ते म्हणाले. तसेच या अपघातात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना पंतप्रधान सहाय्यता निधीतून २ लाख रुपये, जखमींना ५० हजार रुपायांची आर्थिक मदत दिली जाईल, अशी माहितीही त्यांनी दिली.