गेल्या वर्षी ज्या कायद्यावरून सत्ताधारी व विरोधकांप्रमाणेच देशभरात संमिश्र प्रतिक्रिया उमटू लागल्या होत्या, तो CAA अर्थात नागरिकत्व सुधारणा कायदा येत्या आठवड्याभरात देशभरात लागू होणार असल्याचं भाजपाकडून सांगितलं जात आहे. भाजपाचे केंद्रीय मंत्री शांतनु ठाकूर यांनी पश्चिम बंगालमध्ये एका कार्यक्रमात केलेल्या भाषणादरम्यान हे विधान केलं आहे. त्यामुळे नागरिकत्व कायद्यासंदर्भात चर्चांना उधाण आलं आहे. २०१९ साली नागरिकत्व सुधारणा कायदा संसदेत मंजूर झाला असून त्यानंतर झालेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कायद्याच्या अंमलबजावणीसंदर्भात टप्प्याटप्प्याने निर्णय घेतले जात आहेत.

प्रत्येक राज्यात होणार अंमलबजावणी?

पश्चिम बंगालच्या २४ परगणा जिल्ह्यातल्या काकद्वीप भागात झालेल्या कार्यक्रमात शांतनु ठाकूर यांनी नागरिकत्व सुधारणा कायद्याबाबत भूमिका मांडली.”नुकतंच राम मंदिराचं उद्घाटन करण्यात आलं आहे. आज मी तुम्हाला खात्रीने सांगतो, की येत्या सात दिवसांत फक्त पश्चिम बंगालमध्येच नाही तर आख्ख्या भारतात नागरिकत्व सुधारणा कायदा लागू केला जाईल. देशातल्या प्रत्येक राज्यात या कायद्याची अंमलबजावणी केली जाईल”, असं शांतनु ठाकूर यांनी या कार्यक्रमात सांगितलं.

CM Mamata Banerjee at JR doctors protest place near Swasthya
Kolkata Rape Case : “हा माझा शेवटचा प्रयत्न”, आंदोलकांच्या भेटीला गेलेल्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा आंदोलक डॉक्टरांना इशारा!
29th September rashibhavishya in marathi
२९ सप्टेंबर पंचांग: भाग्याची साथ की आर्थिक घडी…
gst council decides to form new gom for health insurance premium
विमा हप्त्यांवरील जीएसटी कपात लांबणीवर; बैठकीत व्यापक सहमती, नोव्हेंबरमध्ये निर्णय अपेक्षित अर्थमंत्री
badlapur school girl rape case marathi news
बदलापूर: ‘त्या’ माध्यम प्रतिनिधीला जामीन मंजूर, वकील संघटनांचा पुढाकार, अन्य आरोपींनाही जामीन
bangladesh seeks extradition of ex pm sheikh hasina
शेख हसीना यांच्या प्रत्यार्पणाचे प्रयत्न; विद्यार्थी आंदोलनादरम्यान सामूहिक हत्याकांडाचा आरोप
Rajkot Rape case
Rajkot Rape Case : बलात्कार करून फरार झालेला भाजपा कार्यकर्ता ४० दिवसांनंतर गजाआड, न्यायालयाचाही दणका
himachal pradesh assembly passes new bill
पक्षांतरबंदी कायद्यांतर्गत अपात्र ठरलेल्या आमदारांना पेन्शन न देण्याचे विधेयक हिमाचल प्रदेशात मंजूर
ST services disrupted across the state ST organization meeting with Chief Minister
एसटीची राज्यभरातील सेवा विस्कळीत, एसटी संघटनेची मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक

सरन्यायाधीशांचं राज्यघटनेबाबत मोठं विधान; म्हणाले, “राज्यघटनेतील तरतुदी मुक्त न्यायव्यवस्थेसाठी पुरेशा नाहीत”!

अमित शाह यांचा निर्धार

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या अंमलबजावणीसाठी भारतीय जनता पक्ष बांधील असल्याचं विधान केलं होतं. “दीदी (ममता बॅनर्जी) कायम स्थलांतरितांमध्ये या कायद्याबाबत संभ्रम निर्माण करतात. पण मी हे स्पष्ट सांगू इच्छितो की CAA हा संसदेत मंजूर झालेला कायदा आहे. त्याची अंमलबजावणी कुणीही रोखू शकत नाही. प्रत्येकाला नागरिकत्व मिळेल. आमच्या पक्षाची ही बांधीलकी आहे”, असं अमित शाह पश्चिम बंगालमधील भाजपा पदाधिकाऱ्यांसमोर म्हणाले होते.

CAA मंजूर झाल्यानंतर काय झालं?

२०१९ साली संसदेमध्ये नागरिकत्व सुधारणा कायदा पारित झाला. मात्र, कायदा मंजूर झाल्यानंतर लागलीच विरोधकांसह देशात अनेक ठिकाणी कायद्याविरोधात आंदोलने सुरू धाली. विरोधकांनी कायद्याला परखड शब्दांत विरोध केला. या पार्श्वभूमीवर हा कायदा पारित झाला असला, तरी त्याच्या अंमलबजावणीसंदर्भात नियमावली अद्याप स्पष्ट झालेली नाही. अफगाणिस्तान, बांगलादेश आणि पाकिस्तानमधून ३१ डिसेंबर २०१४ पूर्वी भारतात आलेल्या हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी व ख्रिश्चन स्थलांतरितांना भारतीय नागरिकत्व देण्यासंदर्भात या कायद्यात तरतुदी करण्यात आल्या आहेत.