कलकत्ता उच्च न्यायालयाचे न्यायाधीश चित्तरंजन दास यांनी सोमवारी निवृत्त होताना केलेल्या समारोपाच्या भाषणामध्ये आपण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक असल्याचे जाहीर केले. मात्र, न्यायाधीश म्हणून काम करताना ३७ वर्षांच्या काळात आपण संघापासून दूर राहिलो असेही त्यांनी सांगितले.न्या. दास यांनी गेल्या १४ वर्षांपासून उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून काम पाहिले आहे. कलकत्ता उच्च न्यायालयात येण्यापूर्वी ते ओडिशा उच्च न्यायालयात न्यायाधीश होते.

हेही वाचा >>> Lok Sabha Polls Phase 5 : पाचव्या टप्प्यात ५९ टक्क्यांहून अधिक मतदान; पश्चिम बंगालमध्ये हिंसाचाराचे गालबोट

Sandip Ghosh RG Kar Medical College
Kolkata Rape Case : “आर. जी. कर रुग्णालयाचे माजी प्राचार्य संदीप घोष मोठ्या रॅकेटचा भाग”, सीबीआयचा न्यायालयात दावा!
8th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
८ सप्टेंबर पंचाग: मेष, कुंभसह ‘या’ पाच राशींच नशीब बदलणार इंद्र योग; सुखाच्या सरी बरसणार तर कोणाचे कष्ट वाढणार; वाचा तुमचे भविष्य
Sugarcane, Delhi High Court, Supreme Court,
ऊस दराचा लढा दिल्ली उच्च न्यायालयात; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
mother in law and son convicted for setting ablaze daughter in law
शिक्षा स्थगितीस न्यायालयाचा नकार; नववधूची हुंड्यासाठी हत्या; पतीसासूच्या जन्मठेपेच्या शिक्षेची केवळ नऊच वर्षे पूर्ण
The Supreme Court has taken cognizance of the case of rape and murder of a trainee doctor in Kolkata
बलात्कार, हत्या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाकडून दखल; कोलकात्यातील घटनेप्रकरणी उद्या सुनावणी
constitution
संविधानभान: संसदीय कामकाजाचे स्वरूप
doctor protest in kolkatta
डॉक्टर बलात्कार, हत्या प्रकरण: तपास सीबीआयकडे; कलकत्ता उच्च न्यायालयाचा आदेश, ममता सरकारला धक्का
kirit somaiya
Kirit Somaiya : किरीट सोमय्यांच्या अडचणी वाढणार? कथित आयएनएस विक्रांत घोटाळ्याप्रकरणी न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय; म्हणाले…

कलकत्ता उच्च न्यायालयाचे इतर न्यायाधीश आणि बारचे सदस्य यांच्या उपस्थितीत समारोपाच्या समारंभात भाषण करताना न्या. दास बोलावणे आले तर कोणतेही सहाय्य करायला किंवा त्यांच्या क्षमतेप्रमाणे काम करण्यासाठी ते परत संघात जायला तयार आहेत असे स्पष्ट केले. ते म्हणाले की, ‘‘काही लोकांना हे आवडणार नाही, मी येथे हे कबूल केले पाहिजे की मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सदस्य होतो. मी त्या संघटनेला खूप काही देणे लागतो. मी माझ्या बालपणापासून आणि संपूर्ण युवावस्थेत संघात होतो.’’ मी धाडसी, प्रामाणिक आणि इतरांबद्दल समानता बाळगण्यास शिकलो, त्याशिवाय राष्ट्रभक्ती आणि कामाप्रति निष्ठा शिकलो असे दास यावेळी म्हणाले.

न्या. दास पुढे म्हणाले की, ‘‘मी संघाच्या सदस्यत्वाचा वापर करून प्रगती केली नाही कारण ते माझ्या तत्वांच्या विरुद्ध आहे. सगळ्यांना समान वागणूक दिली, मग तो श्रीमंत असो किंवा गरीब, साम्यवादी असो किंवा भाजपचा, काँग्रेसचा किंवा तृणमूल काँग्रेसचा सदस्य असो.’