नवी दिल्ली : केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) केंद्र सरकारच्या नियंत्रणाखाली कायद्यानुसार काम करतो, असे सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी स्पष्ट केले. पश्चिम बंगाल सरकारच्या याचिकेवरील केंद्राचा आक्षेप न्यायालयाने फेटाळत, ती दाखल करून घेतली होती. ‘दिल्ली विशेष पोलीस आस्थापना कायदा, १९४६’ नुसार केंद्रीय सतर्कता आयोगाचे लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्ह्यांच्या तपासावर नियंत्रण आहे, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

पश्चिम बंगाल सरकारने अशा खटल्यांच्या तपासाबाबत संमती रद्द करूनदेखील सीबीआय चौकशी करत असल्याने आक्षेप घेतला होता. १६ नोव्हेंबर २०१८ रोजी पश्चिम बंगाल सरकारने नियम करून सीबीआयला चौकशी किंवा छापे टाकणे यासाठी राज्य सरकारची संमती घेणे अनिवार्य केले होते. कायद्यातील तरतुदी पाहता सर्व अधिकार केंद्राकडे असल्याचे दिसते, असे न्यायालयाने नमूद केले. केंद्र सरकारच्या आधिपत्याखाली याची स्थापना झाली, त्यांच्या निरीक्षणाखाली त्याचे काम चालते, असे न्यायमूर्ती बी. आर. गवई आणि संदीप मेहता यांच्या खंडपीठाने नमूद करत पश्चिम बंगाल सरकारची याचिका स्वीकारली.

Petitioners against reservation of Maratha society claim in High Court Mumbai news news
मराठा समाजाचे मागासलेपण स्वयंघोषित; आरक्षणविरोधी याचिकाकर्त्यांचा उच्च न्यायालयात दावा
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
construction houses mangroves, state government,
खारफुटीवर घरे बांधल्याच्या तक्रारीच्या तपासणीचे राज्य सरकारला आदेश
MPSC, autonomy MPSC, Interference MPSC, satej patil
‘एमपीएससी’च्या स्वायत्ततेत हस्तक्षेप?
ministers given permission till august 30 for transfers within department ahead of poll
सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी मंत्र्यांना ‘मोकळे रान’; बदल्यांसाठी ३० ऑगस्टपर्यंत मुभा, मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
missing women, High Court, State Govt,
बेपत्ता महिलांचा शोध घेण्यासाठी ठोस यंत्रणा आहे का ? उच्च न्यायालयाची राज्य सरकार, पोलिसांना विचारणा
kolkata rape and killing supreme court asks centre states to take urgent steps for doctors safety
डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी तातडीने पावले उचला ; सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र, राज्य सरकारांना निर्देश
Dalit organizations, Bharat Bandh, Nagpur,
नागपूर : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात दलित संघटना रस्त्यावर, भारत बंदला…

हेही वाचा >>> “कट-ऑफ कमी करण्याची मागणी केल्यापेक्षा अभ्यास करा”, वकिलीचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सरन्यायाधीशांनी सुनावलं!

विशेष पोलीस पथकाची घटना किंवा विविध गुन्ह्यांचे अध्यादेश, त्यांचे वर्गीकरण आदींची चौकशी दिल्ली विशेष पोलीस आस्थापना कायद्यानुसार होते. केंद्र सरकार असे काही गुन्हे अधिकृत राजपत्रात निर्देशित करते, त्याची चौकशीही या कायद्यानुसार होते, असे खंडपीठाने ७४ पानी निकालपत्रात नमूद केले.

१३ ऑगस्टला पुढील सुनावणी

सीबीआयवर केंद्राचे नियंत्रण नाही, असा महान्याय दावा अभिकर्ता तुषार मेहता यांनी केला होता. राज्य सरकारने संमती मागे घेऊनही सीबीआय गुन्हे दाखल करत आहे, तसेच चौकशी प्रक्रिया पुढे नेत आहे, अशी याचिका पश्चिम बंगाल सरकारने केली होती. केंद्र सरकारविरुद्ध याचिका दाखल करताना अनुच्छेद १३१ चा दाखला पश्चिम बंगाल सरकारने दिला होता. केंद्र आणि राज्य सरकारदरम्यान वाद उद्भवल्यास सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्राबाबत अनुच्छेद १३१ ही विशेष तरतूद आहे. त्यामुळे या खटल्याच्या दखलयोग्यतेबाबत केंद्राचा आक्षेप न्यायालयाने फेटाळला. कायद्यानुसार ही सुनावणी सुरू राहील असे स्पष्ट करत १३ ऑगस्ट रोजी याची पुढील सुनावणी ठेवली आहे.