कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये पंचायत निवडणुकांदरम्यान झालेला हिंसाचार बघता केंद्राचा हस्तक्षेप आवश्यक असून अनुच्छेद ३५५ लागू करण्यासारखी स्थिती असल्याचा दावा भाजपचा सत्यशोधन समितीने केला आहे. तर दुसरीकडे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गुन्हेगारांवर कारवाईसाठी पोलिसांना मुक्तहस्त दिल्याचे जाहीर केले.

नुकत्याच पार पडलेल्या पंचायत निवडणुकांदरम्यान पश्चिम बंगालमध्ये अनेक ठिकाणी हिंसाचार उसळला. त्यानंतर भाजपने माजी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांच्या नेतृत्वाखाली चार सदस्यीय सत्यशोधन समिती गठित केली होती. या समितीने आपले निष्कर्ष मांडताना ममता बॅनर्जी यांनी अराजक आणि बेकायदा कारभाराचा डाव्यांच्या सरकारचा विक्रमही मोडला आहे, असा आरोप प्रसाद यांनी केला. राज्यात होत असलेला हिंसाचार आणि हत्या याला संपूर्णत: राज्य सरकार जबाबदार असल्याचेही ते म्हणाले. हिंसाचारावर काँग्रेस आणि डाव्या पक्षांचे केंद्रीय नेतृत्व मौन का बाळगून आहे, असा सवालही प्रसाद यांनी केला.

prashant kishor on bihar liquor ban
“बिहारमध्ये सत्ता आल्यास, तासाभरात दारुबंदी उठवू”; जनसुराज्य पक्षाचे अध्यक्ष प्रशांत किशोर यांची घोषणा
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
loksatta analysis osama bin laden s son hamza is alive preparing to attack
ओसामा बिन लादेनचा मुलगा जिवंत? अल कायदाचा म्होरक्या बनून ९/११ सारख्या हल्ल्याची तयारी करतोय? नवीन माहितीमुळे खळबळ!
Amit Shah Mumbai, Amit shah news,
Amit Shah Mumbai : महायुतीतील धुसफूस चव्हाट्यावर नको! अमित शहा यांची सूचना; पक्षाच्या निवडणूक तयारीचा आढावा
security tightened in manipur following fresh violence
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; ड्रोन हल्ल्यांविरोधात इम्फाळमध्ये मोर्चा, पोलिसांकडून अश्रुधुराचा मारा
maharashtra minister chandrakant patil come down on road to fill potholes in city pune
चंद्रकांत पाटील यांच्याकडून ‘कोथरूड’मध्ये ‘खड्डे’ बुजविण्याची दक्षता; हे सर्व निवडणुकीसाठी असल्याची विरोधकांची टीका
fresh attack in manipur
Manipur Violence : वृद्ध नागरिकाच्या हत्येनंतर मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचाराची घटना; दोन सशस्र गटातील गोळीबारात पाच जणांचा मृत्यू
massive protest in kolkata demanding resignation of cm mamata banerjee
पश्चिम बंगालमध्ये आंदोलनाने तणाव; डॉक्टर प्रकरणात मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी; पोलिसासह आंदोलक जखमी

उच्च न्यायालयाच्या आदेशावरच निवडणुकीचे निकाल अवलंबून

पश्चिम बंगालमधील पंचायत निवडणुका आणि निकाल जाहीर करणे हे आमच्या अंतिम आदेशांच्या अधीन असेल, असे कलकत्ता उच्च न्यायालयाने बुधवारी सांगितले. मतदानाच्या दिवशी निवडणूक गैरप्रकारांच्या आरोपांबाबत उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. न्यायालयाने राज्य निवडणूक आयोग, राज्य सरकार आणि केंद्र सरकारला गैरप्रकाराचा आरोप करणाऱ्या तीन याचिकांमध्ये केलेल्या सर्व आरोपांबाबत प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश दिले. ८ जुलै रोजी झालेल्या पंचायत निवडणुकीदरम्यान मोठय़ा प्रमाणात हिंसाचार आणि निवडणूक गैरप्रकार झाल्याचा आरोप करत सुमारे ५० हजार बूथवर फेरमतदान घेण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाला द्यावे, अशी विनंती याचिकाकर्त्यांनी न्यायालयाकडे केली आहे.

तृणमूल काँग्रेसला घवघवीत यश, भाजप दुसऱ्या क्रमांकावर

पश्चिम बंगालमध्ये झालेल्या ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू असून ग्रामपंचायत, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या आतापर्यंत जाहीर झालेल्या निकालामध्ये तृणमूल काँग्रेसने निर्विवाद आघाडी घेतली आहे. तृणमूल काँग्रेसने ३४ हजार ९०१ जागा जिंकल्या आणि ते ६१३ जागांवर आघाडी घेतली आहे. प्रमुख विरोधी पक्ष भाजप दुसऱ्या स्थानावर आहे. एकेकाळी राज्यावर दीर्घकाळ सत्ता गाजवलेल्या माकप तिसऱ्या तर काँग्रेस चौथ्या स्थानावर आहे. भाजपला ९ हजार ७१९ जागा मिळाल्या असून ते १५१ जागांवर आघाडीवर आहेत.

हिंसाचारामध्ये झालेल्या मृत्यूंमुळे मी व्यथित झाले आहे. १९ मृतांमध्ये बहुतांश तृणमूलचेच कार्यकर्ते आहेत. हिंसाचार घडविणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी मी पोलिसांना पूर्ण मोकळीक दिली आहे. – ममता बॅनर्जी, मुख्यमंत्री, पश्चिम बंगाल