सर्वोच्च न्यायालयाने आम आदमी पार्टीला राउज एव्हेन्यू या ठिकाणी असलेलं पक्ष कार्यालय १५ जूनपर्यंत रिकामं करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणात न्यायालयात तिखट वाद आणि युक्तिवाद पाहण्यास मिळाला. त्यानंतर नर्मविनोदही झाला. ज्याची चर्चा आता चांगलीच रंगली आहे.

काय घडलं सर्वोच्च न्यायालयात?

सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी वरिष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवींना म्हणाले, “तुम्ही या प्रकरणात कुठल्याही राजकीय पक्षातर्फे यायला नको होतं. तुम्ही दिल्ली उच्च न्यायालयाच्या जमिनीचा विरोध कसा करता? तुम्ही आम्हाला पाठिंबा द्यायला पाहिजे.” या नर्मविनोदानंतर अभिषेक मनु सिंघवी आणि चंद्रचूड यांना हसू आलं. या नर्मविनोदाची चर्चा रंगली आहे.

Vasai Rajiv Patil, Bahujan Vikas Aghadi claim,
वसई : राजीव पाटील यांच्यावर अन्याय नाही; बविआचा दावा, ताकदीने निवडणूक लढवणार
17th October Rashi Bhavishya In Marathi
१७ ऑक्टोबर पंचांग: धनसंपत्ती की प्रचंड यश, गुरुवारी…
MP Sanjay Raut On Supreme Court Dhananjaya Chandrachud
Sanjay Raut : “सरन्यायाधीश साहेब, तुम्हाला रात्रीची झोप कशी लागते?” संजय राऊतांचा थेट हल्लाबोल; ‘या’ निकालाचा दिला दाखला!
Shilpa Shetty, Raj Kundra, Shilpa Shetty house,
शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांना घर जप्तीपासून तूर्त दिलासा
Hitendra Thakur, Rajiv Patil, Hitendra Thakur latest news,
प्रत्येकाला स्वत:ची मते असतात – हितेंद्र ठाकूर; राजीव पाटील पक्षांतराच्या मुद्द्यावर प्रतिक्रिया
Narendra Modi statement that the people of Kashmir are waiting for a terror free government print politics news
काश्मिरी जनतेला दहशतवादमुक्त सरकारची प्रतीक्षा – मोदी
BJP questioned Rahul Gandhi after a corruption case was filed against Siddaramaiah
सिद्धरामय्यांच्या पाठीशी राहणार का?भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल झाल्याने भाजपचा राहुल गांधी यांना सवाल
Interrogation of Siddaramaiah by Lokayukta Police Decision of the Special Court
सिद्धरामय्यांची लोकायुक्त पोलिसांकडून चौकशी; विशेष न्यायालयाचा निर्णय, गुन्हा दाखल होणार

CJI चंद्रचूड, न्यायमूर्ती जे. बी. पारदीवाला आणि न्यामूर्ती मनोज मिश्रा या तिघांच्या पीठाने आपच्या मुख्य कार्यालयासाठी पर्यायी जमीन देण्यासाठी आम्हाला आपकडून निवेदन दिलं गेलं आहे. त्यासाठी चार आठवड्यात जमीन आणि विकास कार्यालयाने उत्तर द्यावं अशी मुदत आम्ही देत आहोत. हा विभाग केंद्र सरकारच्या शहर आणि नागरि विकासाच्या अंतर्गत काम करतो.

याबाबत आपच्या वतीने सिंघवी यांनी प्रतिवाद केला. त्यांनी म्हटलं आहे पक्षाला मुख्य कार्यालयासाठी जमीन मिळाली पाहिजे. तसंच ती जमीन निश्चित केली पाहिजे. कारण आप हा पक्ष देशातल्या सहा राष्ट्रीय पक्षांपैकी एक आहे. त्यांना जमीन द्यायची आहे त्याला नकार देता कामा नये असंही सिंघवी म्हणाले.

हे पण वाचा- जिल्हा न्यायालयांत जामीन का नाही? सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा जिल्हा न्यायाधीश परिषदेत प्रश्न

यानंतर तुषार मेहतांनी सरकारच्या वतीने युक्तिवाद केला. त्यानंतर चंद्रचूड म्हणाले कुणीही कायदा आपल्या हाती घेऊ शकत नाही. एखादा राजकीय पक्ष आम्ही अतिक्रमणाचा मुद्दा मांडल्यावरही शांत कसा राहतो? उच्च न्यायालयाने या जागेचा कब्जा दिला पाहिजे. हायकोर्ट ही जागा लोकांच्या प्रश्नांसाठी वापरेल. आपतर्फे मात्र अतिक्रमणाचे आरोप फेटाळण्यात आले आहे. दिल्ली सरकारने हा भूखंड आम्हाला दिला होता असं आपने म्हटलं आहे. तसंच सिंघवी म्हणाले की ती जागा २०१५ मध्ये आपला देण्यात आली. मात्र एमिकस क्यूरीचे परमेश्वर यांनी सांगितलं की तो भूखंड २०२२ मध्ये कौटुंबिक न्यायालयाच्या बांधणीसाठी ठेवण्यात आला होता. या वाद-प्रतिवादात सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांचा नर्मविनोद ऐकण्यास मिळाला.