जिनिव्हा : पूर्व लडाख भागामध्ये घुसखोरी केलेले चीनचे ७५ टक्के सैन्य माघारी गेले असल्याची माहिती परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी गुरुवारी दिली. जिनिव्हामध्ये आयोजित एका मुलाखतीत त्यांनी चीनबरोबर सुरू असलेल्या चर्चेबाबत माहिती दिली.

जयशंकर म्हणाले की, गलवान खोऱ्यामध्ये जून २०२०मध्ये झालेल्या संघर्षामुळे भारत आणि चीनच्या संबंधांवर परिणाम झाला. सीमेवर हिंसा होत असताना द्विपक्षीय संबंध त्यापासून दूर राहू शकत नाहीत. या परिस्थितीवर उपाय शोधण्यासाठी दोन्ही बाजूंच्या वाटाघाटी सुरू आहेत. साधारणपणे ७५ टक्के सैन्य माघारीचा प्रश्न निकाली निघाल्याचे ते म्हणाले. आणखी काही गोष्टी करणे बाकी आहे. सीमावादावर तोडगा निघाला तर दोन्ही देशांदरम्यानचे संबंध सुधारतील असेही परराष्ट्रमंत्र्यांनी सूचित केले. भारत-चीन संबंध गुंतागुंतीचे असल्याचे मान्य करतानाच १९८८मध्ये संबंध चांगले असताना अनेक मुद्द्यांवर सहमती झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

thackeray group criticized pm narendra modi
“पंतप्रधान मोदींना मणिपूरपेक्षा रशिया-युक्रेन युद्धाची काळजी” ठाकरे गटाचं मोदी सरकारवर टीकास्र; म्हणाले…
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
loksatta analysis osama bin laden s son hamza is alive preparing to attack
ओसामा बिन लादेनचा मुलगा जिवंत? अल कायदाचा म्होरक्या बनून ९/११ सारख्या हल्ल्याची तयारी करतोय? नवीन माहितीमुळे खळबळ!
sri lanka first presidential election after economic collapse
विश्लेषण : आर्थिक मंदीनंतर श्रीलंकेत पहिलीच अध्यक्षीय निवडणूक… कुणाची सरशी? भारताशी संबंधांवर परिणाम काय?
nsa ajit doval to visit russia for brics meeting
अजित डोभाल यांचा ‘ब्रिक्स’ बैठकीसाठी रशिया दौरा; रशिया-युक्रेन युद्धावर चर्चेची शक्यता
Russian President Vladimir Putin, nuclear weapons policy,
विश्लेषण : रशियाचे अण्वस्त्र धोरणच बदलण्याचा पुतिन यांचा निर्णय कशासाठी? या बदलांमुळे अणुयुद्धाची शक्यता बळावणार?
What is the humanitarian crisis in Sudan
सुदानमधील लष्करी गटांतील संघर्षामुळे भीषण मानवतावादी संकट… पुढे काय होणार? भारताच्या हितसंबंधांना धोका?
The migration in 2022, supported by airborne foster parents.
नामशेष होत चाललेले पक्षी, हरवलेले स्थलांतराचे मार्ग आणि विमानातून मार्गदर्शन; संवर्धनतज्ज्ञ नेमके काय करत आहेत?

हेही वाचा >>> Jammu And Kashmir Assembly Polls: …तरीही जम्मूमध्ये मते भाजपलाच!

संपूर्ण सैन्य माघारीवर सहमती

नवी दिल्ली : लडाख सीमेवरून भारत आणि चीन या दोन्ही देशांनी सर्व सैन्य माघारी घेण्यासाठी गुरुवारी सहमती झाल्याची माहिती देण्यात आली. रशियाच्या दौऱ्यावर असलेल्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी चीनचे परराष्ट्रमंत्री वँग यी यांची सेंट पीटर्सबर्ग येथे भेट घेतली. त्यावेळी सैन्य माघारीसाठी तातडीने आणि दुप्पट प्रयत्न करण्यावर सहमती झाली.

चीनच्या आक्रमणामुळे लडाख सीमेवर दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात सैन्य तैनात करण्यात आले आहे. आम्हाला हा मुद्दा हाताळावाच लागेल. – एस. जयशंकर, परराष्ट्रमंत्री