केंद्र सरकारने आपल्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर, पुन्हा उपोषण करण्याचा इशारा पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी रविवारी ‘पीटीआय’शी बोललताना दिला. लडाखला राज्याचा दर्जा पुन्हा देणे आणि घटनात्कम संरक्षण या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी केंद्र सरकारने लडाखच्या अधिकाऱ्यांना बालवावे.

हेही वाचा >>> Delhi Coaching Incident: दिल्ली IAS कोचिंग सेंटर दुर्घटनेवर राहुल गांधींची प्रतिक्रिया; म्हणाले, “संस्थांच्या बेशिस्तपणाची किंमत…”

Mokka Justice Amit Shete acquitted four criminals from mokka charges for not provided strong evidence
कल्याणमधील आंबिवलीतील सराईत गुन्हेगारांची न्यायालयाच्या आदेशावरून मोक्कामधून मुक्तता
18th October 2024 Horoscope In Marathi
१८ ऑक्टोबर पंचांग: नोकरदारांच्या कुंडलीत अच्छे दिन तर…
Baba Siddiqui murder case, Baba Siddiqui,
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणः …या कारणामुळे हल्लेखोरांनी दुचाकी वापरली नाही
violence against women, Three-faced Ravan burnt,
महिलांवरील अत्याचाराच्या घटनांचा निषेध, पुण्यात शरद पवार गटाकडून तीन तोंडी रावणाचे दहन
Balasaheb Thorat phone call, Sudhir Mungantiwar,
थोरात यांचा थेट वनमंत्र्यांना फोन… वनमंत्र्यांनी दिले बिबट्याला गोळ्या घालण्याचे आदेश! नेमके काय घडले?
India vs Bangladesh 1st T20I Match Updates in Marathi
IND vs BAN 1st T20 सामन्यापूर्वी ग्वाल्हेरमध्ये वाढवली सुरक्षा, नेमकं काय आहे कारण? जाणून घ्या
BJP leaders Demand to Give a chance to the old workers while pampering the new ones
हरियाणा विधानसभा निवडणूक : चार वर्षांपूर्वी धुमधडाक्यात सुरु केलेली ‘ती’ योजना भाजपासाठी अडचणीची ठरणार?
Ladki bahin yojana BJP workers meeting Marathwada
‘लाडक्या बहिणीं’चे भाजपकडून तीन हजार मेळावे

अन्यथा, येत्या १५ ऑगस्टपासून २८ दिवसांचे उपोषण करू असे त्यांनी सांगितले.वांगचुक म्हणाले की, गेल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी द्रास येथे कारगिल विजय दिनानिमित्त आले असता, लडाखमधील ‘अपेक्स बॉडी, लेह’ (एबीएल) आणि ‘कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्स’ (केडीए) या संस्थांनी त्यांना निवेदन सादर करून आपल्या मागण्या मांडल्या. ते म्हणाले की, ‘‘निवडणुकांदरम्यान सरकारवर फार दबाव आणण्याची आमची इच्छा नव्हती. तसेच निवडणुकीनंतरही सरकारला थोडा वेळ दिला पाहिजे असे आमचे मत होते.

नवीन सरकार काही ठोस पावले उचलेल अशी आम्हाला आशा आहे. आमच्या नेत्यांना चर्चेसाठी बोलावले जाईल, तसे न झाल्यास आम्ही पुन्हा निदर्शने सुरू करू.’’ लडाखला राज्याचा पुन्हा मिळावा आणि राज्यघटनेच्या सहाव्या परिशिष्टात त्याचा समावेश व्हावा या मागण्यांसाठी वांगचुक यांनी मार्च महिन्यात २१ दिवस उपोषण केले होते. त्या काळात ते केवळ मीठाचे पाणी पित होते. मात्र, सरकारने प्रतिसाद न दिल्याने त्यांनी उपोषण स्थगित केले होते.