मुंबईत गुरुवारी संध्याकाळी २३ वर्षीय महिला छायापत्रकारावर झालेल्या पाशवी बलात्काराचे शुक्रवारी राज्यसभेत तीव्र पडसाद उमटल़े या वेळी प्रक्षुब्ध सदस्यांनी महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनांबाबत चिंता व्यक्त केली, तर शासनाने गुन्हेगारांवर कठोर कारवाईचे आश्वासन देत वेळ मारून नेली़
सत्ताधारी पक्षाचे खासदार विजयलक्ष्मी साधो यांनी भाजपशासित मध्य प्रदेशमध्ये सर्वाधिक महिला अत्याचाराच्या घटना घडत असल्याचा आरोप केला़ त्यामुळे काही काळ भाजप आणि काँग्रेसच्या सदस्यांमध्ये खडाजंगी झाली़ विरोधी पक्षाच्या खासदाराने या वक्तव्याचा उभे राहून समाचार घेण्यास सुरुवात केली आणि काँग्रेसच बलात्काराच्या घटनेला राजकीय रंग देत असल्याचे म्हटल़े
यावरून सुरू असलेला गदारोळ दुर्दैवी असल्याचे असल्याचे नमूद करीत केंद्रीय गृह राज्यमंत्री आरपीएन सिंग यांनी, महाराष्ट्र शासनाकडून याबाबतची सविस्तर माहिती मागविल्याचे सांगितल़े तसेच या प्रकरणी महाराष्ट्र शासनाला आरोपींना तातडीने अटक करावी आणि त्यांना कठोरातील कठोर शिक्षा करावी, अशा सूचना देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितल़े
दरम्यान, शून्य प्रहराच्या काळात भाजपच्या सदस्या स्मृती इराणी यांनी सातत्याने होणारे हे प्रकार रोखण्यासाठी शासनाने काया पावले उचलली आहेत, असा प्रश्न उपस्थित केला़ दिल्ली बलात्कार प्रकरणानंतर कायदा आणि सुव्यवस्थेत सुधारणा करण्यात येत असल्याचे आश्वासन देण्यात आले होत़े मात्र त्यानंतरही अशा घटना घडत असल्याचे त्यांनी नमूद केल़े अशा घटना घडल्या की केवळ निषेध व्यक्त करण्यात येतो़ महिलांवरील अत्याचाराबाबत आपण अजून किती काळ गप्प राहून बघ्याची भूमिका घेणार, असा प्रश्नही इराणी यांनी उपस्थित केला़ यापूर्वी मुंबईत महिलेवर झालेल्या अॅसिड हल्ल्याची आणि अमेरिकी महिलेवर रेल्वेत झालेल्या चाकू हल्ल्याची आठवण त्यांनी या वेळी करून दिली़
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा