नवी दिल्ली : भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाने (जीडीपी) चार हजार अब्ज डॉलरचा (चार ट्रिलियन) टप्पा ओलांडल्याच्या दावा केल्याबद्दल काँग्रेसने सोमवारी भाजपला टीकेचे लक्ष्य केले. केवळ बातम्यांचे मथळे निर्माण करून चर्चेत राहण्यासाठी भाजप अशा खोटय़ा बातम्या पसरवत आहे अशी टीका काँग्रेसकडून करण्यात आली.

हेही वाचा >>> केंद्र, राज्यपालांची कानउघाडणी; पसंतीनुसार न्यायमूर्ती नियुक्ती करण्याच्या धोरणावर प्रश्नचिन्ह

Prithviraj Chavan On Budget 2025
Prithviraj Chavan : “अर्थसंकल्पाने आमची घोर निराशा केली”, पृथ्वीराज चव्हाण यांची अर्थसंकल्पावरून टीका
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Gandhi assassination Hindu Mahasabha Mangutiwar Narayan Apte Gwalior
‘गांधीहत्या’ म्हणताच काय आठवते?
Rahul Gandhi list on dishonest people
‘आप’च्या बेईमानांच्या यादीत राहुल गांधींचाही समावेश, भाजपानंतर आता थेट काँग्रेसही लक्ष्य
Former MP Vinayak Raut criticizes Industries Minister Uday Samant in ratnagiri
“भाजप नेत्यांची गद्दारांना जागा दाखवायला सुरवात”, उद्योगमंत्री उदय सामंतांवर माजी खासदार विनायक राऊत यांची सडकून टीका
Radhakrishna Vikhe Patil
Radhakrishna Vikhe Patil : “वाळूच्या गाड्या चालू द्या, काही फरक पडत नाही, सगळे आपलेच लोक”, राधाकृष्ण विखे पाटलांचं धक्कादायक विधान
supriya sule latest news
“असंविधानिक पदनिर्मितीत महाराष्ट्र सर्वांत पुढे”, खासदार सुप्रिया सुळे यांची टीका
Sanjay Raut on Devendra Fadnavis
Sanjay Raut: देवेंद्र फडणवीस लाचार, हतबल मुख्यमंत्री; पालकमंत्रीपदाचा निर्णय बदलताच संजय राऊत यांची टीका

काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी ‘एक्स’वर नमूद केले, की काही केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी हा खोटा दावा केला आहे. काल दुपारी दोन वाजून ४५ मिनिटे ते सहा वाजून ४५ मिनिटांच्या दरम्यान जेव्हा अवघा देश विश्वकरंडक क्रिकेटचा अंतिम सामना पाहत होता तेव्हा राजस्थान आणि तेलंगणशी संबंधित वरिष्ठ केंद्रीय मंत्री, मोदी सरकारचे अनेक समर्थक, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि पंतप्रधानांच्या लाडक्या उद्योजकांनी कालच भारताच्या ‘जीडीपी’ने चार ट्रिलियन डॉलरचा टप्पा ओलांडल्याबद्दल अभिनंदनपर ‘ट्वीट’ केले.

त्यांनी आरोप केला, की ही निखालस खोटी बातमी वातावरण निर्मितीसाठी प्रसिद्ध करण्यात आली होती. खुशामतखोरीतून आणि चर्चेत राहण्यासाठी प्रतिमा उजळवण्यासाठीचा हा एक निराशाजनक प्रयत्न होता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय जलसंपदा मंत्री गजेंद्रसिंह शेखावत, मंत्री किशन रेड्डी, उद्योगपती गौतम अदानी यांनी ‘एक्स’वर भारताच्या या कथित कामगिरीची प्रशंसा केली होती.

Story img Loader