गुलाम नबी आझाद यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्यानंतर ज्येष्ठ काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी आपल्याच पक्षावर ताशेरे ओढले. देशाने त्यांच्या योगदानाचा सन्मान केला मात्र काँग्रेसला त्यांची गरज नाही, हा खूप मोठा विरोधाभास आहे असं वक्तव्य कपिल सिब्बल यांनी केलं आहे. ट्वीट करत सिब्बल यांनी त्यांना शुभेच्छाही दिल्या आहे.

काँग्रेस नेते आणि जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद हे G-23 गटामध्ये सामील आहेत. हा गट पक्षाच्या नेतृत्वामध्ये संघटनात्मक बदल करण्याची मागणी करत होता. केंद्र सरकारकडून गुलाम नबी आझाद यांना त्यांच्या सार्वजनिक जीवनातल्या योगदानाबद्दल पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. यावरून कपिल सिब्बल यांनी काँग्रेसला सुनावलं आहे. देशाला त्यांचं योगदान कळलं, त्यांच्या योगदानाचा सन्मान केला. पण काँग्रेसला मात्र त्यांची गरज नाही. हा फार मोठा विरोधाभास आहे, असं सिब्बल आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले आहेत.

Ramesh Deo
मुंबईतील ‘या’ रस्त्याला दिले दिवंगत अभिनेते रमेश देव यांचे नाव; अजिंक्य देव भावना व्यक्त करत म्हणाले, “त्यांनाही निश्चितच आनंद…”
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Devotee Angry on yogi adityanath and Narendra modi after stampede in maha kumbha mela
महाकुंभातील भक्त योगी-मोदींवर नाराज का?
veer pahariya
राजकारणाऐवजी बॉलीवूड का निवडलं? महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांचा नातू वीर पहारिया म्हणाला…
Milind Gawali
मिलिंद गवळींची अशोक सराफ यांच्यासाठी खास पोस्ट; म्हणाले, “कदाचित म्हणूनच इतक्या वर्षांनंतर…”
Yogi Niranjan Nath selected as Chief Trustee of Sant Dnyaneshwar Maharaj Sansthan Committee
आळंदी : योगी निरंजन नाथ यांची संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या प्रमुख विश्वस्त पदी निवड
Nawab Malik and sameer Wankhede
Sameer Wankhede : नवाब मलिकांना दिलासा; समीर वानखेडेंनी केलेल्या तक्रारीवर पोलिसांनी सादर केला क्लोजर रिपोर्ट!
What Ajit Pawar Said About Saif Ali Khan
Ajit Pawar : सैफ अली खानवरील हल्ल्याचा घटनाक्रम सांगत अजित पवारांचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले, “नवा मुद्दा आला की..”

कपिल सिब्बलही याच G-23 गटामध्ये सामील आहेत. या गटातले काँग्रेस नेत शशी थरूर यांनीही गुलाम नबी आझाद यांना शुभेच्छा देणारं ट्वीट केलं आहे. थरूर लिहितात, गुलाम नबी आझाद यांना पद्मभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचं अभिनंदन. सार्वजनिक जीवनातल्या योगदानाबद्दल दुसऱ्या पक्षाच्या सरकारकडून सन्मान देण्यात येणं ही चांगली गोष्ट आहे. तर काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी मात्र यावरून टोला लगावला आहे. पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांनी पद्म पुरस्कार सन्मान नाकारला. याबद्दल बोलताना ते म्हणाले, हा योग्य निर्णय आहे. त्यांना ‘आझाद’ (स्वतंत्र) राहायचं आहे ‘गुलाम’ नाही.

Story img Loader