जयपूर : जे लोक निवडणुका जिंकू शकत नाहीत, ते ‘मैदानातून पळून गेले असून’, राजस्थानमधून राज्यसभेवर आले आहेत, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांच्यावर टीका केली. देश काँग्रेसला त्याच्या ‘पापांसाठी’ शिक्षा करत असून, एके काळी चारशे जागा जिंकणाऱ्या या पक्षाला यावेळच्या लोकसभा निवडणुकीत तीनशे जागांवर लढण्यासाठी उमेदवार शोधणे कठीण झाले आहे, असे राजस्थानमधील जालोर येथे निवडणूक प्रचार सभेत बोलताना मोदी म्हणाले.

हेही वाचा >>> आरबीआयचे माजी गव्हर्नर डी सुब्बाराव यांनी केंद्र सरकारला दिला ‘हा’ सल्ला; म्हणाले, “श्वेतपत्रिका…”

readers comments on Loksatta editorial
लोकमानस : रेल्वे आता सेवा नव्हे उद्योग
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Budget is satisfactory but is the curse of self-reliance to producers
अर्थसंकल्प ‘समाधानकारक’ पण आत्मनिर्भरतेचा उत्पादकांना शाप?
union budget 2025
अग्रलेख: ‘मधुबनी’में लोकशाही…
delhi assembly elections 2025
लालकिल्ला : दिल्ली भाजपसाठी आणखी प्रतिष्ठेची!
Declining financial and government credibility
घसरण आर्थिक आणि सरकारच्या विश्वासार्हतेचीही!
Devendra Fadnavis expressed regret over the chaos happening in universities Nagpur news
मुख्यमंत्रीच म्हणतात, विद्यापीठांमध्ये अराजकतेचे बिजारोपण…कारण, माओवादी विचार…
Ignoring voter growth led to Assembly elections defeat Vishal Patil admits
मतदार वाढीकडे केलेले दुर्लक्ष विधानसभा निवडणुकीत भोवले; विशाल पाटील यांची कबुली

* जे लोक निवडणूक लढवू शकत नाहीत, निवडणूक जिंकू शकत नाहीत, ते मैदानातून पळून गेले आहेत. या वेळी ते राजस्थानमधून राज्यसभेवर आले आहेत. काँग्रेसची परिस्थिती इतकी वाईट आहे’, असे मोदी यांनी सांगितले.

* मतदानाच्या पहिल्या टप्प्यात निम्म्या राजस्थानने काँग्रेसला दंड केला आहे. काँग्रेस कधीही देशाला मजबूत बनवू शकत नाही हे देशभक्तीने युक्त असलेल्या राजस्थानला ठाऊक आहे’, असे मोदी म्हणाले. २०१४ पूर्वी अस्तित्वात असलेली परिस्थिती परत यावी असे देशाला वाटत नाही, असेही त्यांनी नमूद केले. काँग्रेसने भाईभतिजावाद आणि भ्रष्टाचार यांची वाळवी पसरवून देशाला पोकळ करून टाकले आहे, असा आरोपही त्यांनी केला.

Story img Loader