पीटीआय, नवी दिल्ली

लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्याचे मतदान संपल्यानंतर प्रसिद्ध करण्यात आलेल्या मतदानोत्तर चाचण्यांचे अंदाज खोटे असल्याचा दावा काँग्रेस नेत्यांनी रविवारी केला. महाराष्ट्र, कर्नाटक, पंजाब, हरयाणा, उत्तर प्रदेश आणि राजस्थान या राज्यांमध्ये मतदानोत्तर चाचण्यांमध्ये जे अंदाज वर्तवण्यात आले आहेत, त्यापेक्षा पक्ष अधिक चांगले काम करेल, असा विश्वास काँग्रेस नेत्यांनी व्यक्त केला.

The ruling Shinde Pawar group and the Thackeray group also demand that the polls be held in a single phase
एकाच टप्प्यात मतदान घ्या! सत्ताधारी शिंदे, पवार गटासह ठाकरे गटाचीही मागणी; भाजप, काँग्रेसचे मात्र मौन
Amitabh Bachchan And Rajesh Khanna
“आम्ही अमिताभ बच्चन यांना आणून राजेश खन्नाचे करिअर…
Once again Dushkali Forum in Sanglis politics
सांगलीच्या राजकारणात पुन्हा एकदा ‘दुष्काळी फोरम’
Dharavi mosque illegal portion demolished
धारावी मशिद तोडक कारवाई: मुस्लिम समुदायाला लक्ष्य केल्याचा आरोप, सपा आमदार रईस शेख यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
काँग्रेस नेत्या रश्मी बर्वेंना लोकसभा निवडणुकीपासून वंचित ठेवणारा निर्णय अवैध
Sanjay Dina-Patil, disqualification,
संजय दीना-पाटील यांच्या खासदारकीला आव्हान, शपथपत्रात आईच्या नावाचा उल्लेख नसल्याने अपात्र ठरवण्याची मागणी
election Akola, festival Akola, Akola latest news
अकोल्यात उत्सवातून निवडणुकीची तयारी
maharashtra minister chandrakant patil come down on road to fill potholes in city pune
चंद्रकांत पाटील यांच्याकडून ‘कोथरूड’मध्ये ‘खड्डे’ बुजविण्याची दक्षता; हे सर्व निवडणुकीसाठी असल्याची विरोधकांची टीका

काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी विविध राज्यांतील प्रमुख नेते, प्रदेशाध्यक्ष आणि विधिमंडळ पक्षाच्या नेत्यांशी दृकश्राव्य संवाद साधला. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांनीही काँग्रेस उमेदवारांशी दृकश्राव्य माध्यमातून संवाद साधला. मतमोजणीच्या दिवशी हेराफेरीचे कोणतेही प्रयत्न रोखण्यासाठी सतर्क रहा, असा सल्ला या नेत्यांनी दिला़ मतदानोत्तर चाचण्या बोगस असल्याचे राहुल गांधी यांनी यावेळी सांगितले. निवडणुकीतील हेराफेरीचे समर्थन करण्याचा हा जाणूनबुजून केलेला प्रयत्न आहे. इंडिया आघाडीच्या कार्यकर्त्यांचे मनोबल कमी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून खेळल्या गेलेल्या मानसिक खेळाचा हा भाग आहे, असे राहुल गांधी यांनी सांगितले.