पीटीआय, नवी दिल्ली

मनरेगा योजना चुकीच्या पद्धतीने हाताळल्याबद्दल काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी शुक्रवारी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. ही योजना आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ग्रामीण भारताच्या विश्वासघाताचे ‘जिवंत स्मारक’ झाले आहे, असा आरोप खरगे यांनी केला.

President Draupadi Murmu expressed concern about space debris
अंतराळातील कचऱ्याबद्दल राष्ट्रपतींकडून चिंता व्यक्त
how does suiceide pod work
इच्छामरणासाठी तयार करण्यात आलेले ‘सुसाईड पॉड’ काय आहेत? हे मशीन कसे कार्य करते? याची चर्चा का होत आहे?
RJ Kar Hospital
Kolkata Rape Case : “मी त्याला भेटले तर विचारेन की…”, कोलकाता प्रकरणातील आरोपीच्या आईची प्रतिक्रिया
Violent protests in Assam over the gang rape of a minor girl
आसाममध्ये जोरदार निदर्शने; अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार
PM Narendra Modi Italy Visit
Unified Pension Scheme : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी; नव्या पेन्शन योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी!
Jayant Patil On Raje Samarjeetsinh Ghatge
Jayant Patil : “आम्ही टप्प्यात आल्यानंतर लगेच कार्यक्रम करतो”, समरजितसिंह घाटगेंच्या पक्ष प्रवेशावरून जयंत पाटलांचा भाजपाला इशारा
Air India fined Rs 90 lakh for flying by unqualified pilot
एअर इंडियाला ९० लाखांचा दंड; अपात्र वैमानिकाने विमान चालविल्याने कारवाई
Assam minor gangrape case
Assam Minor Gangrape Case : आसाम सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपीचा मृत्यू, पोलीस म्हणाले, “घटनास्थळी घेऊन जात असताना त्याने…”

खरगे यांनी स्मरण करून दिले की, २००५ मध्ये आजच्याच दिवशी तत्कालीन काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारने ग्रामीण भारतातील कोट्यवधी जनतेला काम करण्याचा अधिकार सुनिश्चित करण्यासाठी ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’ (मनरेगा) लागू केली होती. या योजनेद्वारे १३.३० कोटी मजुरांना रोजगार मिळत होता, असे खरगे म्हणाले.

हेही वाचा >>>Crime News : ट्यूशनवरुन घरी पतरणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार, बेशुद्धावस्थेत सापडली मुलगी, कुठे घडली घटना?

तंत्रज्ञान व आधार वापरण्याच्या नादात मोदी सरकारने सात कोटींहून अधिक कामगारांची रोजगार पत्रे काढून टाकली आहेत. रोजगार पत्रे नसल्याने या कुटुंबांना मनरेगाच्या कामातून काढून टाकण्यात आले आहे, असा दावा खरगे यांनी केला. मनरेगासाठी यंदाची अर्थसंकल्पीय तरतूद एकूण अर्थसंकल्पीय वाटपाच्या केवळ १.७८ टक्के आहे, जी योजनेच्या निधीमध्ये १० वर्षांची नीचांकी आहे, असे ते म्हणाले.