राज्यामधील करोनाग्रस्तांची आणि करोनाचा संसंर्ग होऊ नये यासंदर्भात सरकार घेतलेल्या निर्णयांची माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी राज्य सरकारने घेतलेल्या नवीन निर्णयांची सविस्तर माहिती दिली. तसेच पुढील दोन आठवडे हे आपल्यासाठी अत्यंत महत्वाचे असल्याचेही त्यांनी सांगितले. राज्यामधील करोनाचा प्रसार हा गुणाकार पद्धतीने होऊ नयेसाठी काळजी घेतली जात आहे असं सांगताना परदेशातील आकडेवाडीचा संदर्भ दिला. न्यूयॉर्क आणि इराणचे उदाहरण देताना उद्धव ठाकरे यांनी गुणाकार पद्धतीने करोनाचा संसर्ग वाढत जात असं सांगतानाच परदेशातून आलेल्या व्यक्तींना किमान १५ दिवस बाहेर फिरु नये असं आवाहन केलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उद्धव ठाकरे यांनी दिलेली माहिती मागील अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. यामध्ये न्यूयॉर्कमध्ये पहिल्या आठवड्यात करोनाचा संसर्ग झालेले दोन रुग्ण होते. दुसऱ्या आठवड्यात हा आकडा १०५ झाला तिसऱ्या आठवड्यात तो ६१३ वर गेला. याच पद्धतीने फ्रान्स, इराण, इटली, स्पेनमध्ये तिसऱ्या चौथ्या आठवड्यात करोनाग्रस्तांच्या आकडा हजारोंच्या घरात गेल्याचे पहायला मिळाले. तुम्हीच पाहा खालील आकडेवारी…

न्यूयॉर्क

पाहिला आठवडा – २
दुसरा आठवडा – १०५
तिसरा आठवडा – ६१३

फ्रान्स

पाहिला आठवडा – १२
दुसरा आठवडा – १९१
तिसरा आठवडा – ६५३
चौथा आठवडा – ४४९९

इराण

पहिला आठवडा – २
दुसरा आठवडा- ४३
तिसरा आठवडा – २४५
चौथा आठवडा- ४७४७
पाचवा आठवडा- १२७२९

इटली

पहिला आठवडा – ३
दुसरा आठवडा- १५२
तिसरा आठवडा – १०३६
चौथा आठवडा- ६३६२
पाचवा आठवडा- २११५७

स्पेन

पहिला आठवडा – ८
तिसरा आठवडा – ६७४
चौथा आठवडा – ६०४३

भारत

पहिला आठवडा- ३
दुसरा आठवडा – २४
तिसरा आठवडा – १०५

याच आकडेवारीचा आधार घेत भारतासाठी पुढील दोन आठवडे अत्यंत महत्वाचे असल्याचे सांगितले जात आहे. काही वृत्तवाहिन्यांनाही याच आकडेवारीचा आधार घेत जगभरातील वेगवेगळ्या देशांमध्ये करोना प्रसार होताना तिसऱ्या आठवड्यामध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसल्याचे निदर्शनास आणून दिले. तिसऱ्या आठवड्यात होणारी करोना प्रसाराची साखळी तोडली तर आपण कोरोनाचा प्रसार थांबवण्यास मदत होईल. मात्र हे झाले नाही तर मोठे संकट भारतावरही ओढावेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

भारत हा करोना संसर्गाच्या तिसऱ्या टप्प्यात असल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये सार्वजनिक संपर्कातून म्हणजेच सोशल सर्कलमधून हा आजार पसरतो. यासाठी सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी प्रामुख्याने कारणीभूत असते. या गर्दीच्या माध्यमातून करोनाग्रस्तांच्या संख्येत मोठी वाढ होण्याची शक्यता असते. इटलीत असंच काहीसं झाल्याचं पहायला मिळालं. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात आणि मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात इटलीमध्ये करोनाग्रस्तांची संख्या ३०० वरून थेट दहा हजारांवर गेली.

आणखी वाचा- लॉक डाऊन म्हणजे काय? महाराष्ट्रात काय होणार?

भारतानेही इटली सारखी चूक केली आणि तिसऱ्या टप्प्यामधील संसर्ग भारतामध्ये झाल्यास देशातील करोनाग्रस्तांची संख्या अनेक पटींनी वाढेल अशी भिती व्यक्त केली जात आहे. त्यामुळेच भारतासाठी पुढील एक महिना अतिशय महत्वाचा आहे. याच पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी गर्दी होणाऱ्या कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे.

पुढील काही दिवस भारतासाठी अत्यंत महत्वाचे असल्याचे बोलले जात आहे. म्हणूनच सर्वांनी जास्तीत जास्त काळ घरी थांबवण्याचे आवाहन सरकारी यंत्रणांमार्फत केले जात आहे. कमीत कमी लोक घराबाहेर असतील यासाठी खबरदारीचे उपाय म्हणून राज्यातील शाळा, मॉल, चित्रपटगहे, नाट्यगहे, तरण तलाव, व्यायामशाळा, सार्वजनिक ठिकाणी गर्दी होतील असे राजकीय, धार्मिक कार्यक्रमांवर ३१ मार्चपर्यंत बंदी घालण्यात आली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Coronavirus this is why next 2 weeks are important to stop spreading of coronavirus scsg