गोहत्येसंदर्भातल्या एका प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शमीम अहमद यांनी केलेली एक टिप्पणी सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. देशात गोहत्याबंदी लागू करण्यात यायला हवी, अशी अपेक्षा व्यक्त करतानाच न्यायमूर्ती शमीम अहमद यांनी गायीला संरक्षित राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करायला हवं, अशीही अपेक्षा व्यक्त केली आहे. या सुनावणीवर आणि न्यायमूर्तींच्या टिप्पणीवर सध्या संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

नेमकं प्रकरण काय?

गोहत्येचा आरोप असणाऱ्या एका आरोपीविरोधातील याचिका रद्द करण्याची मागणी करणारी याचिका न्यायालायसमोर दाखल झाली होती. या याचिकेच्या सुनावणीवेळी न्यायमूर्ती शमीम अहमद यांनी भारतीय संस्कृती गायीचं महत्त्व असल्याचं सांगत ही याचिका फेटाळून लावली.

Mumbai, Marol-Maroshi, National Park,
मुंबई : राष्ट्रीय उद्यानातील पात्र झोपडीधारकांचे मरोळ-मरोशीतील पुनर्वसनासही विरोध
ankita walawalkar aka kokan hearted girl first told to raj thackeray about her marriage
“लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर…
Provocative slogans, Rashtriya Swayamsevak Sangh parade, RSS parade, Ratnagiri, RSS parade Ratnagiri,
रत्नागिरी : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संचलनप्रसंगी प्रक्षोभक घोषणा: चौघाजणांविरुद्ध गुन्हा दाखल
Despite no obstruction to Sadhu Vaswani Bridge construction Municipal Corporation cut down trees
झाडे तोडण्याबाबत पुन्हा चूक झाल्यास दंडात्मक कारवाई, ‘राष्ट्रीय हरित न्यायाधीकरणा’ने महापालिकेस फटकारले
court directly asked Maharashtra State Electricity Distribution Commissioner If there are rights then why not take decisions
अधिकार आहेत तर मग निर्णय का नाही घेत? न्यायालयाने थेटच विचारले…
madras high court, RSS route march
“आरएसएसला राज्यात पथसंचलन करण्याची परवानगी द्या”, मद्रास उच्च न्यायालयाचे पोलिसांना निर्देश; म्हणाले, “जर…”
sanjay gandhi national park contribution to mumbai is more than the bmc budget
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे योगदान हे महापालिकेच्या अर्थसंकल्पापेक्षा भरीव; उच्च न्यायालयाची टिप्पणी
Bombay High Court expressed concern over construction of buildings constructed under sra scheme
‘झोपु’ योजनेंतर्गत केलेले बांधकाम ‘झोपडपट्टीच’; निकृष्ट दर्जाच्या बांधकामाबाबत न्यायालयाकडून चिंता व्यक्त

“गायीला संरक्षित राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करा”

दरम्यान, ही याचिका फेटाळून लावताना न्यायालयाने गायींना संरक्षित राष्ट्रीय प्राणी म्हणून जाहीर केलं जायला हवं, असं मत व्यक्त केलं. तसेच, देशभरात गोहत्याबंदी कायदा लागू करण्यात यावा, असं सांगतानाच न्यायालयाने गोहत्या करणारे न्यायालयात सडतील, अशी टिप्पणी केल्याचं वृत्त ‘लाईव्ह लॉ’नं दिलं आहे. यावेळी गायीचं महत्त्व सांगताना न्यायालयाने गायींची पूजा करण्याच्या भारतीय परंपरेला थेट इसवीसन पूर्व सातव्या शतकापर्यंत जुना इतिहास असल्याचं नमूद केलं. वेदिक काळापासून गायींची भारतीय संस्कृतीत पूजा होत असल्याचं ते म्हणाले.

“भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे”

भारत हा धर्मनिरपेक्ष देश असल्याचं न्यायमूर्तींनी यावेळी नमूद केलं. “भारत धर्मनिरपेक्ष देश असून आपण सर्व धर्मांचा आदर करायला हवा. हिंदुत्वामध्ये अशी धारणा आहे की गाय हे पावित्र्य आणि निसर्गाच्या देणगीचं प्रतीक आहे. त्यामुळेच गायींचं संरक्षण आणि संवर्धन व्हायला हवं”, असं न्यायालयाने नमूद केलं.