नवी दिल्ली : ब्रह्मपुत्रेचे पाणी वळवून पुराचा सामना करण्यासाठी आणि कृषी, सिंचन आणि पर्यटनाच्या विकासासाठी ईशान्य भारतात किमान ५० मोठे तलाव उभारण्यात यावेत, असे आदेश केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी दिले. पावसाळ्यातील पूर व्यवस्थापनाच्या आढावा बैठकीत शहा यांनी पूर आणि पाणी व्यवस्थापनासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (ईस्राे) उपग्रह प्रतिमांचा वापर करण्याच्या सूचनाही यंत्रणांना दिल्या.

हेही वाचा >>> पाकिस्तानी दहशतवाद्यांकडे चीनची दूरसंचार उपकरणे

navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
chinese telecom equipment used by pakistani terrorists
पाकिस्तानी दहशतवाद्यांकडे चीनची दूरसंचार उपकरणे
Neet Exam
NEET Paper Leak : आरोपींकडे सापडलेल्या जळालेल्या प्रश्नपत्रिकेतून अनेक खुलासे, तब्बल ६८ जुळणारे प्रश्न अन्…
eou probed alleged irregularities in neet ug examination report submitted to central government
प्रश्नपत्रिका फुटल्याचे स्पष्ट संकेत ‘नीटयूजी’ अनियमिततेप्रकरणी बिहारचा केंद्र सरकारकडे अहवाल सादर
devendra fadnavis analysis
“आपण तीन नाही, तर चार पक्षांशी लढत होतो, तो चौथा पक्ष म्हणजे…”; देवेंद्र फडणवीसांकडून लोकसभेतील निकालाचं विश्लेषण!
vishal patil and uddhav thackeray
“उद्धव ठाकरेंना…”, काँग्रेसला पाठिंबा दिल्यानंतर अपक्ष आमदार विशाल पाटलांचं विधान
nilesh lanke sharad pawar
“निलेश लंकेंना संसदेत पाहून लोक विचारतील, हा कोण…”, शरद पवारांचं वक्तव्य; म्हणाले, “ते मराठीत काय बोलतील…”
Vasundhara Raje
“ज्याचं बोट धरून चालायला शिकले त्यालाच…”, वसुंधरा राजेंच्या मनातली खदखद; नेमका रोख कोणाकडे?

शहा यांनी ‘ग्लेशियल लेक आऊटबर्स्ट फ्लड’चा (जीएलओएफ) सामना करण्याच्या तयारीचा आढावाही घेतला. उत्तम पूर व्यवस्थापनासाठी नद्यांच्या पाण्याच्या पातळीची अंदाज प्रणाली सुधारण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. तसेच ईशान्येकडे किमान ५० मोठे तलाव तयार केले जावेत जेणेकरुन ब्रह्मपुत्रेचे पाणी या तलावांमध्ये वळवता येईल आणि साठवता येईल. यामुळे कमी खर्चात कृषी, सिंचन आणि पर्यटन विकास तसेच पूरस्थिती हाताळण्यासही मदत होईल, असे शहा म्हणाले.

ब्रह्मपुत्रेला वारंवार येणारा पूर ही आसाम आणि ईशान्य प्रदेशाची प्रमुख समस्या आहे. यात दरवर्षी अनेकांचा बळी जातो आणि जमीन पाण्याखाली जाते. गेल्या काही वर्षांत सिक्कीम आणि उत्तराखंडमध्येही अनेकांचा मृत्यू झाला, नागरिक बेघर झाले आणि दळणवळणाचे मार्ग खंडित झाले. पूर आल्यास पाणी वाहून जाण्यासाठी रस्ते बांधणीच्या आराखड्यात नैसर्गिक नाले अविभाज्य भाग असावा, असे शहा म्हणाले.