अमरावती : चक्रीवादळ ‘मिचौंग’ने मंगळवारी दुपारी साडेबारा ते अडीच वाजेच्या दरम्यान आंध्र प्रदेशची दक्षिण किनारपट्टी ओलांडली. यामुळे बापटला जिल्ह्याच्या परिसरात ताशी ९० ते १०० प्रति किलोमीटर वेगाने वारे वाहत असल्याचे अमरावती हवामान केंद्राच्या अधिकाऱ्याने सांगितले. ही हवामान प्रणाली उत्तरेकडे सरकणार असून, चक्रीवादळ कमकुवत होण्याची शक्यता आहे. मात्र वेगवान वादळी वारे वाहतील.

हेही वाचा >>> तमिळनाडूत ‘मिचौंग’चे १२ बळी; चेन्नईत नौका-ट्रॅक्टरने मदत

Mahayuti, Mahavikas Aghadi Vidarbha,
विदर्भातून जास्तीत जास्त जागा जिंकण्याचे महायुती, महाविकास आघाडीचे लक्ष्य
ankita walawalkar aka kokan hearted girl first told to raj thackeray about her marriage
“लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर…
tigers existence in sahyadri belt
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पट्ट्यात आठ वाघांचे अस्तित्व
Sangli district, political supremacy in Sangli district,
सांगलीतील संघर्ष मुद्द्यांवरून गुद्द्यांवर !
union home minister amit shah remark india will be naxalism free by march 2026
मार्च २०२६ पर्यंत देश नक्षलवादमुक्त होणार काय? छत्तीसगडमध्ये आक्रमक नक्षलविरोधी कारवायांमुळे गृहमंत्र्यांचे वक्तव्य पुन्हा चर्चेत…
assembly elections 2024 the grand alliance dilemma over Chakan MIDC pune news
राज्यातील उद्योग पलायन ऐरणीवर! विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर चाकण एमआयडीसीवरून महायुतीची कोंडी
Maharashtra Rain Alert
Maharashtra Rain : कोकण, मराठवाडा, विदर्भात मुसळधारेचा अंदाज; जाणून घ्या, कोणत्या जिल्ह्यांत कसा पाऊस पडणार
Death of a T-9 tiger, ​​Navegaon-Nagzira Sanctuary, tiger,
गोंदिया : वर्चस्वाच्या झुंजीत टी-९ वाघाचा मृत्यू; नवेगाव-नागझिरा अभयारण्याच्या गाभा क्षेत्रातील घटना

प्रसिद्धीपत्रकात नमूद केले, की बंगालच्या उपसागरावरील पश्चिम-मध्य भागावरील हवामान प्रणाली आंध्र प्रदेशच्या दक्षिण भागातील किनाऱ्याजवळून उत्तरेकडे सरकली. जमिनीवर धडकताना या चक्रीवादळाचे केंद्र दक्षिण आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर बापटलाजवळ होते. वादळ भूभागावर पोहोचण्याची प्रक्रिया सुमारे तीन तास चालली. मुख्यमंत्री कार्यालयाने माहिती दिली, की चक्रीवादळ नेल्लोर आणि कावलीदरम्यान भूभागावर धडकले.

या चक्रीवादळामुळे झालेल्या अतिवृष्टीने राज्याच्या अनेक जिल्ह्यांत मोठे नुकसान झाले. पूर, खराब झालेले रस्ते, ओसंडून वाहणारे कालवे, फुगलेले नाले आणि तलावासह या कृषीप्रधान राज्यातील हजारो एकर पिके पाण्याखाली बुडाली. मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांनी आढावा बैठक घेऊन मदतकार्याचा आढावा घेतला. दुसरीकडे, हे चक्रीवादळ ओडिशाकडे सरकण्याची भीती लक्षात घेऊन पटनाईक सरकारने खबरदारीची उपाययोजना केली आहे. लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. तसेच ६ डिसेंबरला सर्व शाळा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.