पीटीआय, नवी दिल्ली

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी सांगितले की, भारतावर कोणी वाईट नजर टाकल्यास, भारतीय सेना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी सुसज्ज, सक्षम आणि तयार आहेत.पूर्व लडाखमध्ये चीनबरोबरचा सुमारे चार वर्षांचा सीमावाद आणि हिंदी महासागरात चिनी सैन्याच्या प्रवेशाबाबतच्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे वक्तव्य केले आहे. एका संरक्षण परिषदेत ते बोलत होते.

Loksatta anvyarth N Chandrababu Naidu ED Skill development scam
अन्वयार्थ: तेव्हा भ्रष्ट, आता स्वच्छ…
17th October Rashi Bhavishya In Marathi
१७ ऑक्टोबर पंचांग: धनसंपत्ती की प्रचंड यश, गुरुवारी…
Loksatta anvyarth Ten years in jail on charges of Naxalism G N Death of Sai Baba
अन्वयार्थ: व्यवस्थारक्षणासाठी तरी मानवाधिकार राखा!
Ravindra Dhangekar Allegation, Radhakrishna Vikhe Patil,
महसूलमंत्र्यांच्या वरदहस्ताने पुनर्वसनाच्या जमिनीमध्ये २०० कोटींचा घोटाळा – आमदार रवींद्र धंगेकर यांचा आरोप
tirupati laddu quality improved devotees appreciate says cm chandrababu naidu zws
तिरुपती लाडूच्या गुणवत्तेत सुधारणा! भाविकांकडून प्रशंसा : मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचा दावा
Prime Minister Narendra Modi belief about Make in India
भारताला कोणीच रोखू शकत नाही! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास; ‘मेक इन इंडिया’ची दशकपूर्ती
yuvasena s dipesh mhatre
कडोंमपाच्या नाममुद्रेचा दिपेश म्हात्रेंनी गैरवापर केल्याची भाजपची आयुक्त डॉ. जाखड यांच्याकडे तक्रार; कायदेशीर कारवाईची मागणी
venus mission isro
काय आहे इस्रोचे ‘मिशन व्हीनस’? इस्रोला शुक्राचा अभ्यास का करायचा आहे? जाणून घ्या या मोहिमेचे उद्दिष्ट

‘भारताची संरक्षण यंत्रणा पूर्वीपेक्षा अधिक मजबूत आहे कारण नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार ‘भारतीयतेच्या भावनेने’ ती मजबूत करण्यावर भर देत आहे,’ असे सांगत सिंह यांनी सध्याच्या आणि पूर्वीच्या सरकारमधील मुख्य फरक म्हणून दृष्टिकोनाचे वर्णन केले. ‘सध्याचे सरकार भारतातील लोकांच्या क्षमतेवर ठाम विश्वास ठेवते, तर पूर्वी सत्तेत असलेले लोक त्यांच्या क्षमतेबद्दल काहीसे साशंक होते. आज केंद्रातील शक्तिशाली नेतृत्वामुळे आपल्या सैन्यात प्रबळ इच्छाशक्ती आहे. सैनिकांचे मनोधैर्य उंचावण्याच्या दिशेने आम्ही सातत्याने काम करत आहोत.’