Delhi IAS Coaching Incident : दिल्लीमधील एका आयएएस कोचिंग सेंटरच्या तळघरात पाणी शिरल्याची घटना शनिवारी रात्री घडली. या घटनेत यूपीएससीची तयारी करणाऱ्या तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर आता विविध स्तरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. या आयएएस कोचिंग सेंटरवर कारवाई करण्याची मागणी आता करण्यात येत आहे. या घटनेनंतर दिल्ली पोलिसांकडून या आयएएस कोचिंग सेंटरच्या मालकासह अन्य एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, या कोचिंग सेंटरच्या तळघरात कोणत्याही परवानगीशिवाय लायब्ररी सुरु करण्यात आली होती, अशी माहिती आता समोर येत आहे. या घटनेवर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया देत अशा संस्थांच्या बेशिस्तपणाची किंमत सर्वसामान्य नागरिकांना आपला जीव गमावून चुकवावी लागत असल्याचं एक्स (ट्विटर) अकाउंटवर पोस्ट करत म्हटलं आहे.

Army officers assaulted and woman gangraped madhya pradesh
Army officers assault Case: ‘बलात्कारी आरोपीला गोळी घाला, नाहीतर मला मारा’, अत्याचारानंतर लष्करी जवानाची मैत्रीण धक्क्यात
15th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
१५ सप्टेंबर पंचांग: आनंदाची वार्ता ते प्रेम, मैत्रीची साथ; १२ पैकी कोणत्या राशीचा हसत-खेळत जाणार रविवार; वाचा तुमचे राशिभविष्य
Girls, hotel room, meet friend, High Court,
मुलींनो, मित्राला भेटायला थेट हॉटेलच्या खोलीत जाऊ नका.. उच्च न्यायालयाचा सल्ला!
pimpri chinchwad crime news
लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या प्रेयसीची हत्या करून रिक्षात ठेवला मृतदेह, प्रियकर फरार
Case against former Shiv Sena corporator Mohan Ugle in Kalyan
कल्याणमधील शिवसेनेचे माजी नगरसेवक मोहन उगले यांच्यावर गुन्हा
Chandrapur, Wekoli, electronic weighing machine, fraud, crores of rupees loss, electronic chip, Ramnagar police, Faiz Traders, Vekoli employees,
चंद्रपूर : वजन काट्यात चीप लावून गैरप्रकार, वेकोलीच्या चार जणांविरूध्द गुन्हा
Amruta Fadnavis
Amruta Fadnavis : शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाल्या, “त्यापेक्षाही मोठा पुतळा…”
Yavatmal, Badlapur incident, Ajit Pawar, Eknath Shinde, Devendra Fadnavis, women's safety, Shakti Act, severe punishment, public sentiment, Maharashtra politics
बदलापूर घटनेवर अजित पवारांची तिखट प्रतिक्रिया…म्हणाले, तो जो आरोपी आहे त्याचे….

हेही वाचा : Old Rajender Nagar Incident : आयएएस कोचिंग सेंटरच्या मालकासह दोघांना अटक; परवानगीशिवाय तळघरात सुरू होती लायब्ररी!

राहुल गांधींनी काय म्हटलं?

“दिल्लीतील एका इमारतीच्या तळघरात पाणी साचल्याने तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू होणं हे अत्यंत दुर्दैवी आहे. काही दिवसांपूर्वी पावसात विजेचा धक्का लागून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता. मी सर्व शोकग्रस्त कुटुंबांप्रती मनापासून संवेदना व्यक्त करतो. पायाभूत सुविधांचा हा ऱ्हास हे व्यवस्थेचं अपयश आहे. असुरक्षित बांधकाम, निकृष्ट नियोजन आणि संस्थांच्या बेशिस्तपणाची किंमत सर्वसामान्य नागरिक आपला जीव गमावून चुकवत आहेत. सुरक्षित आणि आरामदायी जीवन हा प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे आणि सरकारची जबाबदारी आहे”, असं खासदार राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

नेमकं घटना काय घडली?

दिल्लीमधील एका आयएएस कोचिंग सेंटरच्या तळघरात पाणी शिरल्याची घटना शनिवारी रात्री घडली. या घटनेमध्ये यूपीएससीची तयारी करणाऱ्या तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत श्रेया यादव, तान्या आणि नेविन या तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. श्रेया यादव ही उत्तर प्रदेशमधील आंबेडकर नगरमधील रहिवासी असल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेनंतर संतप्त प्रतिक्रिया उमटत असून या कोचिंग सेंटरवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. यानंतर दिल्लीच्या महापौर शेली ओबरॉय यांनी संबंधित कोचिंग सेंटरचे तळघर बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच दिल्ली पोलिसांनी आयएएस कोचिंग सेंटरच्या मालकासह दुसऱ्या एका व्यक्तीला अटक करण्यात केली आहे. तसेच परवानगीशिवाय इमारतीच्या तळघरामध्ये लायब्ररी स्थापन करण्यात आली होती, अशी माहिती समोर आली आहे. दरम्यान, या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.