दिल्ली शहरात प्रदुषणाने गाठलेली कमालीची पातळी सध्या देशभरात चर्चेचा विषय बनली आहे. मात्र, अजूनही दिल्लीतील लोकांनी ही गोष्ट गांभीर्याने घेतलेली दिसत नाही. सध्या सुरू असलेल्या छठपूजा उत्सवाच्या दरम्यान दिल्लीकरांकडून फोडण्यात आलेल्या फटाक्यांवरून त्यांना परिस्थितीशी काहीच देणेघेणे नसल्याचे दिसत आहे. मात्र, प्रत्यक्षात हे प्रदुषण कितपत गंभीर आहे, हे दर्शविणारी दोन छायाचित्रे प्रसिद्ध करण्यात आली आहेत.
खत विभागाचे संयुक्त सचिव धर्मा पाल यांनी त्यांच्या विमान प्रवासादरम्यान ही छायाचित्रे टिपली आहेत. या छायाचित्रातून प्रदुषणामुळे पूर्व आणि उत्तर भारतातील आकाशात झालेले बदल स्पष्टपणे दिसत आहेत. यामध्ये पूर्व भारतातून हिमालयीन पर्वतरांग सहजपणे दृष्टीस पडत आहे. तर उत्तर भारतात दाट धुक्याच्या चादरीमुळे हिमालयाची पर्वतरांग दिसेनासी झाली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये दिल्लीवरून विमानप्रवास करणाऱ्या प्रवाशांनीही अशाप्रकारचा अनुभव सांगितला. प्रवाशांच्या माहितीनुसार, दिल्ली विमानतळावर विमान उतरेपर्यंत धुक्याच्या चादरीमुळे शहराचे दर्शन होणे, अशक्य झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दरम्यान, राष्ट्रीय हरित लवादाकडून या सगळ्या प्रकाराची गंभीर दखल घेण्यात आली असून संबंधित राज्यांच्या भूमिकेवर कडक ताशेरे ओढण्यात आले आहेत. प्रदुषण नियंत्रणात आणण्यासाठी तुम्ही काय उपाययोजना केल्या, असा सवाल लवादाकडून दिल्ली, राजस्थान, हरियाणा आणि पंजाब आणि केंद्र सरकारला विचारण्यात आला आहे. दरम्यान, दिल्लीतील वाढत्या प्रदुषणाने शनिवारी आणि रविवारी सर्वोच्च सीमा पार केली आहे. दिल्लीमध्ये १० तास घालवणे म्हणजे ४० पेक्षा अधिक सिगारेट ओढण्या सारखी धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे राजधानी दिल्लीतील शाळांना ३ दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. सोमवरी दिल्लीतील रस्त्यावर पाण्याची फवारणी करण्यात येणार आहे. दरम्यान उत्पादनावर ५ दिवस बंदी घातली असून  दिल्लीमधील उत्पादन क्षेत्रातील उद्योगातून निर्माण होणारा घनकचरा नष्ट करण्यावर देखील बंदी घालण्यात आली आहे. पुढील दहा दिवस शहरामध्ये जनरेटरच्या वापरावर प्रतिबंध घालण्यात आला आहे. रुग्णालय तसेच महत्त्वाच्या ठिकाणी या बंदीवर शिथला देण्यात आली आहे. नागरिकांनी घरातून बाहेर पडू नये, असे आवाहन केजरीवाल यांनी केले आहे. दिल्लीमध्ये पाला-पाचोळा जाळण्यावर देखील बंदी घालण्यात आली असून यावर नियंत्रण ठेवण्यासाठी मोबाईल अॅप्लिकेशन तयार केले जात आहे. या अॅप्लिकेशनच्या माध्यमातून पाल-पाचोळा जाळण्यात येणाऱ्या परिसराची माहिती अधिकाऱ्यांना तात्काळ मिळणे शक्य होणार आहे.गरज भासल्यास पुन्हा एकदा सम-विषम तारखेवर वाहतूक सुरु केली जाणार असल्याची माहिती देखील केजरीवालांनी दिली.

दिल्लीतील प्रदुषण नियंत्रित करण्यासाठी केजरीवाल सरकारने सम-विषम तारखेनुसार मोटारी रस्त्यावर आणण्याची योजना आखली होती.या योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला होता. पण या योजनेमुळे प्रदूषणाची पातळी किती कमी झाली, हे स्पष्ट झाले नव्हते. दिल्लीतील वाढत्या प्रदूषणावर दिल्ली उच्च न्यायालयाने तीव्र चिंता व्यक्त केल्यानंतरच मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सरकारने एक जानेवारीपासून सम विषम योजना राबविण्याचे गेल्या महिन्यात जाहीर केले होते.