नवी दिल्ली : दिल्लीच्या जलमंत्री आतिशी यांनी हरियाणातून दिल्लीला पाणीपुरवठा करण्याच्या मागणीसाठी सुरू केलेले बेमुदत उपोषण मंगळवारी संपुष्टात आले. मंगळवारी पहाटेपासूनच त्यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यामुळे त्यांना उपोषण थांबवावे लागले. त्यांना दिल्लीच्या लोकनायक रुग्णालयाच्या अति दक्षता विभागात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.

हेही वाचा >>> मराठी खासदारांचा उत्साह; सदस्यत्वाची शपथ घेताना सभागृहात विविध घोषणा

Ajit Pawar in trouble again due to controversial statement
वादग्रस्त विधानाने अजित पवार पुन्हा अडचणीत
Ramdas Kadam On Uddhav Thackeray
Ramdas Kadam : “उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं दोन तासांत आमदार परत आणतो; पण…”, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
minorities targeted in bjp ruled states deeply troubling congress slams bulldozer action in mp
बुलडोझर न्याय अमान्य! अल्पसंख्याकांना लक्ष्य करणे व्यथित करणारे; घरे पाडणे थांबवण्याची काँग्रेसची मागणी
Badalapur Crime News
Badlapur Crime : बदलापूरमध्ये दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार, लोकांचा प्रचंड उद्रेक, आत्तापर्यंत काय काय घडलं?
Bihar Bridge Collapse News
Bihar Bridge Collapse : Video : बिहारमध्ये आणखी एक पूल कोसळला; पूल कोसळल्याची वर्षभरातील १२ वी घटना
earthquake dahanu marathi news
पालघर: डहाणू तालुक्यात पुन्हा भूकंपाचे धक्के
Criticism of Congress state president Nana Patole on river linking project
नदीजोड प्रकल्पातून पाणी गुजरातला देण्याचा घाट; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची टीका
ST bus service, ST bus, ST bus maharashtra,
तोट्यातील ‘एसटी’ नफ्याच्या उंबरठ्यावर, झाले असे की…

दिल्ली भाजपचे अध्यक्ष विरेंद्र सचदेव यांनी आतिशी यांनी चांगले आरोग्य आणि आनंदी राहण्यासाठी शुभेच्छा दिल्या, त्याचवेळी त्यांनी दिल्लीच्या जनतेची दिशाभूल करणे थांबवावे अशी टीकाही केली. लोकनायक रुग्णालयाचे वैद्याकीय संचालक डॉ. सुरेश कुमार यांनी आतिशी यांच्या प्रकृतीबद्दल माहिती देताना सांगितले की, ‘‘सोमवारी संध्याकाळी त्यांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण कमी झाले आणि मूत्रामध्ये किटोन आढळून आले, त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला देण्यात आले होते. मात्र, त्यांनी रुग्णालयात दाखल होण्यास नकार दिला. मात्र, मध्यरात्रीनंतर त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांना चक्कर येऊ लागली, त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.’’ दिल्लीमध्ये गंभीर पाणीसंकट निर्माण झाले असून आप सरकारने हरियाणा आणि हिमाचल प्रदेशकडे पाणी सोडण्याची मागणी केली होती. या मागणीसाठी त्यांनी सर्वोच्च न्यायालयातही दाद मागितली होती. मात्र, न्यायालयाच्या निर्देशानंतरही हरियाणा पाणी सोडत नसल्याचा आरोप करत आतिशी यांनी २१ जूनपासून बेमुदत उपोषणाला सुरुवात केली होती.