धीरेंद्र कृष्ण शास्त्रींनी पाकिस्तानबाबत मोठं विधान केलं आहे. काही लोक देव नसतो, दिव्य शक्ती नसते, हे सर्व ढोंगी आहेत, असं म्हणतात असा आरोप धीरेंद्र शास्त्रींनी केला. तसेच ज्यांना असं वाटतं त्यांनी बागेश्वर बालाजीच्या दरबारात यावं, असं आव्हान दिलं. ते शनिवारी (२७ मे) गुजरातमध्ये आयोजित बागेश्वर धामच्या दिव्य दरबारात बोलत होते.

धीरेंद्र शास्त्री महाराज म्हणाले, “बागेश्वर धाममधील माझ्या वेड्यांनो, तुम्ही तुमच्या आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवा. ज्या दिवशी गुजरातचे लोक अशाप्रकारे संघटित होतील त्या दिवशी भारतच काय, मी पाकिस्तानलाही हिंदू राष्ट्र करेन. इथले लोक म्हणतात की हिंदू राष्ट्र कसं शक्य आहे. हिंदू राष्ट्र होतं, आहे आणि यापुढेही राहील. जे म्हणतात देव नसतो, दिव्य शक्ती नसते, हे सर्व ढोंगी आहेत, त्यांनी बागेश्वर बालाजीच्या दरबारात यावं.

Yuvraj Singh Message to Abhishek Sharma After Historic Century Reveals His Father
Yuvraj Singh Abhishek Sharma: “हे विसरू नकोस की तुला…” अभिषेक शर्माला शतकानंतरही युवराज सिंगने दिल्या सूचना, अभिषेकच्या वडिलांनी सांगितलं काय होता मेसेज
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Mamta Kulkarni On Dhirendra Shastri (1)
धीरेंद्र शास्त्रींचं नाव ऐकताच ममता कुलकर्णीचा संताप; म्हणाली, “त्याचं जितकं वय तितकी वर्षे…”, रामदेव बाबांवरही आगपाखड
Kabir Khan visits Mahakumbh Mela
महाकुंभ मेळ्यात पोहोचला प्रसिद्ध मुस्लीम दिग्दर्शक, म्हणाला, “तुम्ही स्वतःला भारतीय समजत असाल तर…”
maha Kumbh Mela and flow of techniques in Hindu religion culture society structure
‘कुंभमेळा’ आणि हिंदू धर्म-संस्कृती-समाज रचना यांतील तंत्र प्रवाह!
Fatima Sana Shaikh News
Fatima Sana Shaikh : फातिमा सना शेखने सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव; “तो माणूस मला म्हणाला, तुला…”
Mumbai Cop’s Soulful Flute Cover On Ae Watan
‘ऐ वतन – वतन मेरे आबाद रहे तू’…. मुंबई पोलिसाने सादर केले बासरी वादन; Viral Videoने जिंकले भारतीयांचे मन
Dr Mohan Bhagwat statement on religion
Mohan Bhagwat : सरसंघचालक मोहन भागवत यांचं वक्तव्य, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, धर्म म्हणजे….”

“मी गुजरातच्या नागरिकांची दिशाभूल करायला आलो नाही”

“मी गुजरातच्या नागरिकांची दिशाभूल करायला आलो नाही, तर जागरुक करण्यासाठी आलो आहे. जोपर्यंत गुजरात हनुमानमय, राममय होत नाही तोपर्यंत मी गुजरातच्या लोकांचा पाठपुरवा सोडणार नाही,” असं मत धीरेंद्र शास्त्रींनी व्यक्त केलं.

व्हिडीओ पाहा :

हेही वाचा : धीरेंद्र कृष्ण शास्त्रींना वाय दर्जाची सुरक्षा, मध्य प्रदेश सरकारचे आदेश; शास्त्री म्हणाले, “हिंदूराष्ट्र…”

“मी महात्मा नाही, चमत्कार करणारा गुरू नाही”

“मी महात्मा नाही, चमत्कार करणारा गुरू नाही, सिद्धपुरुष नाही आणि देवही नाही. मीही तुमच्यासर्वांसारखा सर्वसाधारण माणूस आहे. मला इतकंच माहिती आहे की, बालाजी माझे आहेत आणि मी बालाजींचा आहे,” असंही धीरेंद्र शास्त्रींनी नमूद केलं.

Story img Loader