केंद्रातील मोदी सरकारला शनिवारी चार वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त भाजपाकडून देशभरात विविध कार्यक्रम राबवून सरकारच्या कामगिरीबद्दल जनजागृती निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. दुसरीकडे केंद्र सरकार कसे अपयशी ठरले हे सांगण्यात काँग्रेसनही पुरेपूर प्रयत्न केला. दरम्यान, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी मोदी सरकारवर टीका करत भ्रष्टाचारावर या सरकारने काहीच काम केले नसल्याची टीका केली आहे. काळ्या पैशांबाबत देशातील ज्येष्ठ विधीज्ञ राम जेठमलानी आणि अर्थमंत्री अरूण जेटली यांच्यात खुली चर्चा व्हावी असे आव्हान त्यांनी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांना दिले आहे. भ्रष्टाचारावर मोठमोठे दावे करणाऱ्या भाजपा सरकारने गुजरातमध्ये अजूनही लोकायुक्त नेमलेला नाही. चार वर्षांत लोकपालही नियुक्त केलेला नाही. सांप्रदायिकता वाढवणे आणि हिंदू-मुसलमानांच्या नावावर हिंदूना मत मागणे, हा भाजपाचा एकमेव अजेंडा असल्याची घणाघाती टीका त्यांनी केली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा