तेलंगणामध्ये प्रजासत्ताक दिनी राज्य सरकारने उच्च न्यायालयाच्या आदेशाची अवज्ञा केल्याची घटना समोर आली आहे. तेलंगणात सलग दुसऱ्या वर्षी प्रजासत्ताक दिनाचा सार्वजनिक कार्यक्रम झाला नाही. राज्यपाल मिलसाई सुंदराजन यांनी राजभवनात राष्ट्रध्वज फडकावला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव गैरहजर होते. ते अन्य ठिकाणी पायाभरणीच्या कार्यक्रमाला गेले.

खरं तर, करोना महामारीमुळे तेलंगणा सरकारने सलग दुसऱ्या वर्षी प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम राजभवनात घेण्याचे आवाहन केले होते. पण हे प्रकरण उच्च न्यायालयात गेलं. यावर उच्च न्यायालयाने सिकंदराबाद येथे प्रजासत्ताक दिनाचा सोहळा पूर्ण तयारीनिशी आयोजित करावा, असे निर्देश दिले होते. पण उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सिकंदराबाद येथे हा कार्यक्रम झाला नाही.

Request to Urban Development Minister eknath shinde for Uruli-Phursungi TP scheme
उरुळी-फुरसुंगी ‘टीपी’साठी नगरविकास मंत्र्यांना साकडे!
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Why were local elections delayed in the state
राज्यात स्थानिक निवडणुका लांबणीवर का पडल्या? तिसरी बाजी कोणाची? 
State government claims in High Court that there is no policy decision yet to start group schools Mumbai news
समूह शाळा सुरू करण्याचा अद्याप धोरणात्मक निर्णयच नाही; राज्य सरकारचा उच्च न्यायालयात दावा, जनहित याचिका निकाली
Hearing on municipal elections in Supreme Court on February 25
निवडणुका पावसाळ्यानंतर? पालिकांबाबत सर्वोच्च न्यायालयात आता २५ फेब्रुवारीला सुनावणी
Maharashtra Corporation Election
स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर; सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पुढे ढकलली!
Sanjay Raut on bmc elections
Sanjay Raut : मुंबई पालिकेत ठाकरे गटाचा स्वबळाचा नारा, इतर शहरांचं काय? संजय राऊतांनी केलं स्पष्ट; म्हणाले…
youths Ambernath questions republic day hoardings future corporators
प्रजासत्ताकदिनी तरूणांनी वेधले लक्ष ; प्रजासत्ताक दिनाचे बॅनर का नाहीत, भावी नगरसेवकांना सवाल

मुख्यमंत्री गैरहजर राहिल्याने राज्यपालांचा संताप

तेलंगणाच्या राज्यपाल मिलसाई सुंदरराजन यांनी मुख्यमंत्री केसीआर राजभवनातील कार्यक्रमाला उपस्थित न राहिल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. मुख्यमंत्र्यांनी संविधानाचा अवमान केला, हे राज्याच्या इतिहासात लिहिलं जाईल.

यावर राज्यपाल म्हणाल्या की, “तेलंगणाने प्रजासत्ताक दिनाच्या उपक्रमाला कमी लेखलं आहे. येथे कोणताही सार्वजनिक कार्यक्रम पार पडला नाही. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांच्या विरोधात जाऊन मुख्यमंत्र्यांनी कोणताही सार्वजनिक कार्यक्रम आयोजित केला नाही.” मी राजभवनातच ध्वजारोहण करावं आणि या कार्यक्रमाला लोकसहभाग नसावा, अशी मुख्यमंत्र्यांची इच्छा होती, असा आरोप राज्यपाल सुंदरराजन यांनी केला.

राज्यपाल पुढे म्हणाल्या, “तेलंगणाचे मुख्यमंत्री राजभवनातील कार्यक्रमाला उपस्थित राहतील, अशी मला आशा होती. कारण दोन महिन्यांपूर्वी मी त्यांना पत्र लिहिलं होते की, यावेळी लोकसहभागाने कार्यक्रम भव्य पद्धतीने आयोजित करण्यात यावा. पण त्यांनी पत्राला उत्तर दिलं नाही. दोनच दिवसांपूर्वी त्यांनी हा कार्यक्रम राजभवनात व्हावा, असे पत्र दिलं. त्या पत्रातही त्यांनी राजभवनातील कार्यक्रमाला हजेरी लावणार असल्याचा उल्लेख केला नाही. हा सर्व प्रकार लोक बघत आहेत.”

Story img Loader