बेकायदेशीरपणे आंतरराष्ट्रीय सागरी हद्दीत घुसल्याप्रकरणी श्रीलंकेच्या नौदलाकडून अटक करण्यात आलेल्या आठ भारतीय मच्छीमारांची श्रीलंका न्यायालयाने शुक्रवारी सुटका केली.
आपल्या हद्दीत घुसल्याचा आरोप करीत १५ जून रोजी श्रीलंकेच्या नौदलाने आठ भारतीय मच्छीमारांना अटक केली होती. या मच्छीमारांना तेव्हापासून न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले होते.  
दरम्यान, श्रीलंकेच्या नौदलाने वेगवेगळ्या दिवशी अटक केलेले अन्य ४१ मच्छीमार अद्याप श्रीलंकेच्या ताब्यात आहेत. या मच्छीमारांच्या कोठडीत २२ ऑगस्टपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

Story img Loader