पीटीआय, नवी दिल्ली

भारताला २०४७ पर्यंत विकसित भारताचे उद्दिष्ट गाठायचे असेल, तर खासगी क्षेत्राला गुंतवणुकीसाठी प्रोत्साहन द्यायला हवे. केवळ सरकारी भांडवली खर्च आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करू शकणार नाही, असे आर्थिक पाहणी अहवालाने म्हटले आहे. पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात खासगी क्षेत्राचा सहभाग वाढला पाहिजे. विविध प्रकल्पांवर काम करण्याची, धोका पत्करण्याची, महसुलाच्या आदानप्रदानामधील, व्यवस्थापन कौशल्यामधील क्षमता वाढविणे गरजेचे आहे. सरकारच्या प्रयत्नांना खासगी क्षेत्राच्या भागीदारीचीही जोड हवी.

Bank Of Maharashtra Recruitment 2025: Application Begins For 172 Posts, No Written Exam how to apply know details
BOM Recruitment: बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; कोणत्याही परिक्षेशिवाय मिळणार नोकरी, अर्ज कसा करायचा जाणून घ्या
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
Declining financial and government credibility
घसरण आर्थिक आणि सरकारच्या विश्वासार्हतेचीही!
Extension of toll concession on Atal Setu Mumbai news
अटल सेतूवरील टोल सवलतीला मुदतवाढ; आणखी वर्षभर २५० रुपयेच पथकर
india global shipping hub
Sarbananda Sonowal : जागतिक नौकावहन केंद्र म्हणून देशाची महत्त्वाकांक्षा – सोनोवाल
sbi nifty bank index fund latest news
‘एसबीआय निफ्टी बँक इंडेक्स फंड’ गुंतवणुकीस खुला
devendra fadnavis to attend world economic forum in davos
गुंतवणुकीत प्रादेशिक समतोल; दावोस दौऱ्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्धार
Indian economic growth
दोन आर्थिक वर्षांत ६.७ टक्के विकास दराने भारताचे मार्गक्रमण – जागतिक बँक

तसेच, खासगी क्षेत्रानेही त्यासाठी पुढे येण्याची गरज आहे. विकसित भारत साकारण्यासाठी वार्षिक विकासदर किमान दोन दशके ८ टक्के असणे गरजेचे आहे. गरजा खूप आहेत. संकटांना सामोरे जाऊ शकणारे शहरीकरण, सार्वजनिक वाहतूक, वारसास्थळे, स्मारके सुरक्षित ठेवणे आदी मुद्द्यांकडे लक्ष द्यायला हवे.

Story img Loader