काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या विमानात तांत्रिक बिघाड झाला आहे. यामुळे त्यांना पुन्हा दिल्लीला परतावं लागलं आहे. राहुल गांधी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने प्रचार करण्यासाठी पाटणा येथे जात असताना त्यांच्या विमानात तांत्रिक बिघाड झाला. यामुळे राहुल गांधी यांच्या सभांना उशीर होणार आहे. राहुल गांधी यांनी स्वत: ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे.
Engine trouble on our flight to Patna today! We’ve been forced to return to Delhi. Today’s meetings in Samastipur (Bihar), Balasore (Orissa) & Sangamner (Maharashta) will run late. Apologies for the inconvenience. pic.twitter.com/jfLLjYAgcO
— Rahul Gandhi (@RahulGandhi) April 26, 2019
राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये लिहिलं आहे की, ‘आज पाटणा येथे जात असताना आमच्या विमानात तांत्रिक बिघाड झाला. यामुळे आम्हाला दिल्लीला परतावं लागलं आहे. बिहारमधील समस्तीपूर, ओडिसामधील बालासोर आणि महाराष्ट्रामधील संगमनेर येथील सभांना यामुळे उशीर होईल’. राहुल गांधी यांनी यासोबत माफीदेखील मागितली आहे. ट्विटसोबत विमानातील व्हिडीओ शेअर केला असून यामध्ये वैमानिक कॉकपीटमध्ये बसलेले दिसत असून राहुल गांधीही दिसत आहेत.