रशिया आणि युक्रेनदरम्यान गेल्या काही दिवसांपासून युद्ध सुरू आहे. या युद्धामुळे अनेक भारतीय नागरिक युक्रेनमध्ये अडकून पडले आहेत. केंद्र सरकारक़डून तिकडे अडकलेल्या नागरिकांना सोडवण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत. अशातच केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते यांनी केलेल्या एका विधानाची जोरदार चर्चा सुरू आहे.


केंद्रीय मंत्री व्ही. के.सिंग हे पोलंडकडे रवाना होणार आहेत. तिथून ते युक्रेनमधल्या भारतीयांना सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. याविषयी बोलताना ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे मोठं पाऊल उचललं आहे. युक्रेनमध्ये अडचणीत असलेला एकही भारतीय नागरिक मागे राहणार नाही. युद्धक्षेत्रात बंधने आहेत, संभ्रम आहेत, सीमांवरही काही अडचणी आहेत. तुमच्याकडे संयम नसेल आणि तुम्ही सूचनांचे पालन केले नाही, तर परिस्थिती बिकट होऊ शकते.

neet paper leaks cbi teams in bihar gujarat for combined investigation
‘नीट’ पेपरफुटीच्या तपासाला वेग; सीबीआयची पथके बिहार, गुजरातमध्ये; देशभरातील ५ गुन्ह्यांची एकत्रित चौकशी
Pune, thieves,
पुण्यात चोरट्यांचा धूमाकूळ; पोलिसांनी गस्त वाढवूनही चोरीचे प्रकार सुरूच
dayanidhi Maran slams amit shah
“हीच वागणूक तुम्ही निर्मला सीतारमण यांनाही दिली असती का?” ‘त्या’ व्हिडीओवरून माजी केंद्रीय मंत्र्याने अमित शाहांना सुनावलं!
crpf jawan killed in encounter with terrorists
कथुआतील हल्ल्यात जवान शहीद; कारवाईत दोन्ही दहशतवाद्यांना कंठस्नान
Narendra Modi and Rahul gandhi (3)
“भाजपा सरकारमध्ये दहशतवादी हल्ल्यांची योजना आखणाऱ्यांना…”, राहुल गांधींचा नरेंद्र मोदींना थेट प्रश्न
Bhandara, Bhandara Sub Divisional Police Officer, woman Harassment Allegations, woman Harassment Allegations police office, Sub Divisional Police Officer Faces Suspension, Opposition Demands Thorough Investigation,
भंडारा : तरुणी तक्रार करायला गेली मात्र पोलीस अधिकाऱ्याने शरीरसुखाची मागणी केली, राजकीय वातावरण तापले
Israel attacks school in Gaza
गाझातील शाळेवर इस्रायलचा हल्ला, ३३ जण ठार
sharad pawar supriya sule
जुन्या मित्रांबरोबर लवकरच चर्चा; निकालानंतर राहुल गांधी यांची घोषणा, खरगे यांचा मोदींवर हल्लाबोल


पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक करताना सिंग पुढे म्हणाले, तुम्ही मंगळावर जरी अडकला असाल तरी भारतीय दुतावास तुमची मदत करेल. ही भारताची रणनीती आहे. पंतप्रधान मोदी याबाबतीत दूरदृष्टीने विचार करत आहेत. त्यामुळे ते चार मंत्र्यांना पाठवत आहेत. सरकार त्यांना मायदेशी परत आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहे. त्यांनी केवळ संयम ठेवून सुरक्षित राहावं.


भारतीय नागरिकांना युद्धभूमीतून परत आणण्यासाठी ऑपरेशन गंगा राबवण्यात येत आहे. याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तातडीने उच्चस्तरीय बैठक घेत चार मंत्र्यांना या मोहिमेवर पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. हरदीप पुरी, ज्योतिरादित्य शिंदे, किरेन रिजीजू आणि निवृत्त जनरल व्ही. के. सिंग हे चार मंत्री या मोहिमेवर जाणार आहेत.