ज्या देशाचा मूळ उद्योग हा केवळ दहशतवाद असेल, तो देश कधीही कठीण परिस्थितीतून बाहेर पडू शकत नाही, अशा शब्दात परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी पाकिस्तानला सुनावलं आहे. पुण्यात परराष्ट्र मंत्रालयाद्वारे आयोजित आशिया आर्थिक संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेसह विविध मुद्द्यांवर भाष्य केलं.

हेही वाचा- जागतिक बँकेच्या अध्यक्षपदासाठी अजय बंगा यांची शिफारस

PM Narendra Modi on Swachh Bharat Abhiyan
Narendra Modi : नरेंद्र मोदींचं विरोधकांना उत्तर, “स्वच्छ भारत योजनेची खिल्ली उडवणाऱ्यांना सांगतो, आम्ही रद्दी विकून २३०० कोटींचा निधी…”
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
PM Narendra Modi Speech
PM Narendra Modi : नरेंद्र मोदींचं वक्तव्य; “आपल्या देशातल्या एका पंतप्रधानांना मिस्टर क्लिन म्हटलं जायचं, तेच म्हणाले होते…”
What Narendra Modi Said?
PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींचं वक्तव्य, “नेहरू-इंदिरा गांधींपासून काँग्रेसच्या सरकारांमध्ये १२ लाखांवर ३ लाखांचा कर…”
lokmanas
लोकमानस: सर्वसमावेशक अर्थसंकल्पाची अपेक्षा
US to extradite Pakistani terrorist Tahawwur Rana to India
२६/११ चा पाकिस्तानी दहशतवादी तहव्वूर राणाला अमेरिका भारतात पाठवणार… मुंबई हल्ल्यात नेमका सहभाग काय?
Saif Ali Khan Records Statement With Mumbai Police
हल्ला झाला तेव्हा करीना कपूर कुठे होती? स्वतः सैफनेच पोलिसांना सांगितलं; जबाबात म्हणाला, “मी हल्लेखोराला…”
Saamana critiques Shiv Sena leadership on Balasaheb Thackeray’s birth anniversary, targeting the Shinde faction.
“शिवसेनारूपी कवचकुंडले मोडून ती तोतया शिंदेंच्या हाती सोपवली”, बाळासाहेब ठाकरेंच्या जयंती दिनी ठाकरे गटाची टीका

काय म्हणाले एस. जयशंकर?

भारत आणि पाकिस्तान या दोन देशताील संबंधाच्या केंद्रस्थानी दहशतवाद हा महत्त्वाचा मुद्दा आहे, हे नाकारता येणार नाही. ही एक मुलभूत समस्या आहे. याकडे आपण दुर्लक्ष करून चालणार नाही. प्रत्येक देशांने आपल्या आर्थिक समस्यांवर मात करणं आवश्यक आहे. मात्र, ज्या देशाचा मूळ उद्योग हा केवळ दहशतवाद असेल, तो देश कधीही कठीण परिस्थितीतून बाहेर पडू शकत नाही. असा देश कधीच समृद्ध होऊ शकत नाही, अशी प्रतिक्रिया एस. जयशंकर यांनी दिली.

शेजारी देश आर्थिक अडचणीत सापडणं, कोणाच्याही हिताचं नाही

पाकिस्तानची अर्थव्यवस्था आज डबघाईला आली आहे. शेजारी देश अशाप्रकारे आर्थिक अडचणीत सापडणं. कोणात्यांही देशाच्या हिताचं नसतं. एखादा देश जेव्हा गंभीर आर्थिक संकटात सापडतो, तेव्हा त्यातून बाहेर पडण्यासाठी त्यांना कठोर राजकीय आणि धोरणात्मक निर्णय ध्यावे लागतात. मुळात पाकिस्तानच्या दुर्देशेला स्वत: पाकिस्तानच जबाबदार आहे. असंही ते म्हणाले. तसेच पाकिस्तानला आर्थिक मदत देण्याबाबात बोलताना, यासंदर्भात कोणताही निर्णय घेण्यापूर्वी देशातील जनभावनांचा विचार करणं आवश्यक आहे, असं मतही त्यांनी व्यक्त केलं.

हेही वाचा – China Earthquake : टर्कीनंतर आता चीन आणि ताजिकिस्तानमध्ये भूकंपाचे धक्के; तीव्रता ६.८ रिश्टर स्केल

पुण्यात आशिया आर्थिक संवाद परिषदेचं आयोजन

पुण्यात २३ ते २५ फेब्रुवारीदरम्यान परराष्ट्र मंत्रालयावतीने आशिया आर्थिक संवाद परिषदेच्या सातव्या सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, काल उद्धघाटन कार्यक्रमाला एस. जयशंकर यांच्यासह भूतानचे अर्थमंत्री ल्योनपो नामगे शेरिंग आणि मालदीवचे अर्थमंत्री इब्राहिम अमीरदेखील उपस्थित होते. या परिषदेची थीम ‘आशिया आणि जागतिक व्यवस्था’ अशी आहे.

Story img Loader