चंदीगड : पिकांना किमान आधारभूत किंमत देण्याचा कायदा आणण्यासाठी संसदेचे विशेष एकदिवसीय अधिवेशन बोलवावे, अशी मागणी शेतकरी नेते सर्वण सिंग पांढेर यांनी मंगळवारी केली. कर्जमाफीसह शेतकऱ्यांच्या अन्य मागण्या मान्य कराव्यात अशी विनंतीही त्यांनी केंद्र सरकारकडे केली.

सरकारने रविवारी चर्चेच्या चौथ्या फेरीत धान्य, मैदा आणि कापसाला पाच वर्षे हमीभाव देण्याचा प्रस्ताव ठेवला होता. पण हा प्रस्ताव शेतकऱ्यांच्या हिताचा नसल्याचे सांगत तो सोमवारी आंदोलकांनी फेटाळला आणि ‘दिल्ली चलो’ची हाक दिली. त्यानंतर आज पंधेर यांनी वरील मागणी केली. संयुक्त किसान मोर्चा आणि किसान मजदूर मोर्चा ‘दिल्ली चलो’चे नेतृत्व करत आहेत.

mahayuti eknath shunde devendra fadanvis ajit pawar
मविआ सत्तेत आल्यास कल्याणकारी योजनांवर गदा; ‘रिपोर्ट कार्ड’च्या प्रकाशनप्रसंगी मुख्यमंत्र्यांचा आरोप
17th October Rashi Bhavishya In Marathi
१७ ऑक्टोबर पंचांग: धनसंपत्ती की प्रचंड यश, गुरुवारी…
sushma andhare replied to devendra fadnavis
“देवेंद्र फडणवीस हेच ‘फेक नरेटिव्ह’चं महानिर्मिती केंद्र”; सुषमा अंधारेंचं प्रत्युत्तर; म्हणाल्या…
Ravindra Dhangekar Allegation, Radhakrishna Vikhe Patil,
महसूलमंत्र्यांच्या वरदहस्ताने पुनर्वसनाच्या जमिनीमध्ये २०० कोटींचा घोटाळा – आमदार रवींद्र धंगेकर यांचा आरोप
legal notice to cm eknath shinde including finance minister ajit pawar over ladaki bahin yojana
लाडकी बहीण योजना राजकीयदृष्ट्या प्रेरित; मुख्यमंत्र्यांसह अर्थमंत्र्यांना कायदेशीर नोटीस
shinde shiv sena set up entire system required for modi rally in thane
पंतप्रधानांच्या दौऱ्यावर मुख्यमंत्र्यांची छाप
Prime Minister Narendra Modi Home Minister Amit Shah visit Thane district
मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात भाजपची मोर्चेबांधणी सुरू; पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांचा ठाणे जिल्हा दौरा
cost of inauguration ceremony of Metro should be taken from honorarium of cm and Deputy cm says MLA Ravindra Dhangekar
मेट्रोच्या उदघाटन सोहळ्याचा खर्च मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या मानधनामधून घेतला पाहिजे : आमदार रवींद्र धंगेकर

हेही वाचा >>> शेखला अद्याप अटक का नाही? संदेशखली प्रकरणी कलकत्ता उच्च न्यायालयाची राज्य सरकारला विचारणा

‘‘हमीभावाची हमी देणारा कायदा सरकारने आणावा अशी आमची मागणी आहे. पंतप्रधानांनी इच्छाशक्ती दाखवल्यास संसदेचे एकदिवसीय अधिवेशन बोलवता येईल. कोणताही विरोधी पक्ष याला विरोध करणार नाही’’, असे पंधेर म्हणाले. पंजाब आणि हरियाणामधील शंभू सीमेवर ते माध्यमांशी बोलत होते. बुधवारी दिल्लीला कूच करून जाण्याच्या घोषणेवर शेतकरी ठाम असल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, शेतकरी आणि केंद्रीय मंत्र्यांमधील चर्चा निष्फळ ठरवण्यात पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यशस्वी झाले, असे म्हणत पंजाब भाजपचे अध्यक्ष सुनील जाखड यांनी मान यांच्यावर निशाणा साधला. रविवारी शेतकरी आणि केंद्र सरकारमध्ये झालेल्या चर्चेच्या चौथ्या फेरीत आपचे नेते मान सहभागी झाले होते. ही चर्चा निष्फळ ठरली.

दुसरीकडे, सरकारचा खोडसाळपणा लक्षात आल्यानेच शेतकऱ्यांनी प्रस्ताव फेटाळला, अशी प्रतिक्रिया काँग्रेसने दिली. तर, ‘एमएसपी’च्या कायदेशीर हमीमुळे अर्थसंकल्पावर ओझे होणार नसून उलट जीडीपीचा विकासच साधला जाईल असा दावा काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केला. काँग्रेसने हमीभावाचे आश्वासन दिल्यापासून मोदी सरकार एमएसपीविरोधात खोटा प्रचार करत आहे अशी टीका त्यांनी केली. हमीभाव दिल्यास सरकारवर २१ हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे, ही रक्कम एकूण अर्थसंकल्पाच्या केवळ ०.४ टक्के आहे. या हमीमुळे कृषी क्षेत्रातली गुंतवणूक वाढेल, ग्रामीण भारतातील मागणी वाढेल आणि शेतकऱ्यांचा विविध प्रकारची पिके घेण्याचा विश्वास दुणावेल. ही देशाच्या समृद्धीची हमी आहे, अशी टिप्पणी त्यांनी ‘एक्स’वर केली.