छत्तीसगडच्या कावर्धा जिल्ह्यात भीषण अपघात झाला आहे. कुकडूर पोलीस ठाणे क्षेत्रातील बहपनी गावाजवळ पिकअप ट्रक खड्ड्यात पडल्याने १५ मजूर ठार झाले आहेत. यामध्ये १४ महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. ANI ने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

पिकअप ट्रकमध्ये तेंदूपत्ता गोळा करून परतत असलेले २५ मजूर होते. ट्रक खड्ड्यात पडल्याने २५ जण खड्ड्यात पडले. यामध्ये १४ महिला आणि एका पुरुषाचा मृत्यू झाला. तर आठ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती कावर्धाचे पोलीस अधिक्षक अभिषेक पल्लव यांनी दिली.

Sharad Pawar criticism that such rulers have not been seen in the history of the maharshtra state pune print news
बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर शरद पवारांनी केली देवेंद्र फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी; म्हणाले, “गृहमंत्री एवढ्या सौम्यतेने…”
ankita walawalkar aka kokan hearted girl first told to raj thackeray about her marriage
“लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर…
Aarey - BKC Underground Metro Inauguration,
आरे – बीकेसी भुयारी मेट्रो लोकार्पण : विरोधकांनी प्रकल्प रोखल्याने ‘मेट्रो ३’चा खर्च १४ हजार कोटींनी वाढला – पंतप्रधान मोदी
Narendra Modi Thane, Narendra Modi Ghodbunder,
विकासशत्रू महाविकास आघाडीला रोखा – पंतप्रधान नरेंद्र मोदी
pm narendra modi in maharashtra
“देशातील तरुणांना अंमलीपदार्थ विकून काँग्रेसला निवडणूक लढवायची आहे”, वाशिममधील सभेतून पंतप्रधान मोदींचे टीकास्र; म्हणाले…
PM Modi visit Thane on Saturday Mahayutti office bearers defaced Ghodbunder with placards
पंतप्रधानांच्या सभेपूर्वी घोडबंदर विद्रुप, मोदी हेलेकाॅप्टरने येणार तरीही अतिउत्साही पदाधिकाऱ्यांची घोडबंदरभर फलकबाजी
mayur mundhe quits bjp
पंतप्रधान नरेंद्र मोदींचं मंदिर बांधणाऱ्या ‘त्या’ भाजपा कार्यकर्त्याची पक्षाला सोडचिठ्ठी; दिलं ‘हे’ कारण
Ajit Pawar demand to BJP regarding the post of Chief Minister print politics news
मुख्यमंत्रीपद ‘फिरते’ हवे? अजित पवार यांची भाजपकडे मागणी

हेही वाचा >> भारतीय वंशाच्या व्यक्तीचं पहिलंवहिलं अंतराळ पर्यटन; किती येतो खर्च?

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला शोक

या घटनेवरून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शोक व्यक्त केला आहे. “कावर्धा, छत्तीसगड येथे झालेला रस्ता अपघात अत्यंत वेदनादायी आहे. या दुर्घटनेत ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले त्यांच्याबद्दल माझ्या संवेदना आहेत. यासोबतच सर्व जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत अशी मी प्रार्थना करतो. राज्य सरकारच्या देखरेखीखाली स्थानिक प्रशासन पीडितांना सर्वतोपरी मदत करतील”, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

तर, छत्तीसगडचे उपमुख्यमंत्री विजय शर्मा यांनीही शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले, “कावर्धा येथे कामगारांनी भरलेलं पिकअप वाहन उलटल्याने १५ जणांचा मृत्यू झाल्याची बातमी वेदनादायी आहे. या अपघतातात ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे त्या सर्व कुटुंबांसोबत माझ्या संवेदना आहेत. पीडितांच्या कुटुंबीयांना विलंब न करता भरपाई द्यावी, अशी मी मागणी सरकारकडे केली आहे.”