Pakistan Army On Kargil War : कारगिल युद्धात पाकिस्तानी सैन्याची भूमिका होती, अशी सार्वजनिक कबुली पाकिस्तानी आर्मीकडून देण्यात आली आहे. संरक्षणदिनाच्या कार्यक्रमात बोलताना पाकिस्तानचे लष्कर प्रमुख असीम मुनीर यांनी यासंदर्भात विधान केलं आहे. १९६५ चं युद्ध असो, १९७१ चं युद्ध असो किंवा १९९९ चं कारगील युद्ध असो, देशासाठी आणि इस्लामसाठी पाकिस्तानी सैनिक शहीद झाले आहेत, असे ते म्हणाले. त्यांच्या विधानानंतर आता विविध राजकीय चर्चांनाही उधाण आलं आहे.

नेमकं काय म्हणाले लष्कर प्रमुख असीम मुनीर?

“पाकिस्तानात शूरवीर सैनिकांचा एक समूह आहे, जो पाकिस्तानसाठी काहीही करायला तयार आहे. १९४८, १९६५, १९७१ युद्ध असो किंवा १९९९ चं कारगिल युद्ध असो, देशातील हजारो जवानांनी देश आणि इस्लामसाठी बलिदान दिले आहे”, असं असीम मुनीर म्हणाले. या विधानाद्वारे पाकिस्तानी आर्मीने २५ वर्षांनंतर पहिल्यांदाच कारगिल युद्धातील भूमिका मान्य केली आहे. यापूर्वी या हल्ल्यात पाकिस्तानी सैन्याचा सहभाग नसून हा मुजाहिद्दीन यांनी केलेला हल्ला होता, अशी भूमिका पाकिस्तानने मांडली होती.

French woman raped 100 times by 50 men
French woman: १० वर्ष, ५० लोक आणि १०० वेळा बलात्कार; पत्नीला अमली पदार्थ देऊन पतीचं क्रूर कृत्य
15th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
१५ सप्टेंबर पंचांग: आनंदाची वार्ता ते प्रेम, मैत्रीची साथ; १२ पैकी कोणत्या राशीचा हसत-खेळत जाणार रविवार; वाचा तुमचे राशिभविष्य
renukaswamy offere to pavithra gowda live in relationship
Renukaswamy Case Chargesheet: ‘लिव्ह इनमध्ये ये, महिन्याला १० हजार देतो’, चाहत्याची अभिनेत्रीला ऑफर; हत्या होण्यापूर्वी पाठवले गुप्तांगाचे फोटो
Sarvajanik Ganesh Mandal Banner Goes Viral on Mahaprasad Will Be Given Only To Members netizens reacts
सार्वजनिक मंडळाचा ‘तो’ बॅनर पाहून लोक भडकले; PHOTO पाहून सांगा अशा मंडळांचं काय करायचं?
Pooja Khedkar in delhi high court
Puja Khedkar : वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर सरकारी सेवेतून बरखास्त; केंद्र सरकारची मोठी कारवाई
CM bhagwant mann AAP Punjab
Punjab AAP: मोफत देण्याच्या घोषणा ‘आप’च्या अंगलट; पंजाबमध्ये विजेवरील अनुदान रद्द, इंधनावरही कर
Kirit Somaiya
Kirit Somaiya : “मला न विचारताच घोषणा”, किरीट सोमय्यांनी भाजपाचा आदेश धुडकावला; म्हणाले, “पुन्हा अशी वागणूक…”
Jharkhand Excise Constable Competitive Examination candidate died
६० मिनिटांत १० किमी धावा; पोलीस भरतीच्या अटीमुळे १२ उमेदवारांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

हेही वाचा – Narendra Modi in Kargil Vijay Diwas : “पाकिस्तानने आपल्या इतिहासातून…”; कारगिल विजय दिनानिमित्त पंतप्रधानांचा दहशतवाद्यांना इशारा!

कारगिलचे युद्ध काय होतं?

१९९९ मध्ये कारगिलमधील उंच ठिकाणांवर पाकिस्तानी सैन्याने ताबा मिळवला होता. मात्र, सुरुवातीला हे पाकिस्तानी सैनिक नसून मुजाहिद्दीन आहेत, अशी भूमिका पाकिस्ताने मांडली होती. त्यानंतर कारगिलमध्ये पाकिस्तानी सैन्याने केलेली घुसखोरी रोकण्यासाठी आणि त्यांनी काबीज केलेला प्रदेश पुन्हा ताब्यात घेण्यासाठी भारताने ऑप्रेशन विजयची सुरुवात केली. तीन महिने चाललेल्या या युद्धात भारताने पाकिस्तानचा दारुण पराभव केला होता.

हेही वाचा – Kargil War Female Heroes : कारगिल युद्धातील महिला योद्धा! पहिल्या महिला लढाऊ वैमानिकांनी कसा राखला होता जखमी सैनिकांचा गड?

कारगिल युद्धात ५२७ भारतीयांना गमवावे लागले होते प्राण

यादरम्यान, संपूर्ण टायगर हिल्स प्रदेशावर भारतीय लष्कराने ताबा मिळवला. भारतीय लष्कराच्या तीन तुकड्यांनी १८ ग्रेनेडियर्स, २ नागा आणि ८ शिख बटालियनने या प्रदेशात जोरदार गोळीबार करुन हा प्रदेश ताब्यात घेतला होता. ५ जुलै रोजी शरीफ यांनी पाकिस्तान कारगिलमधून सैन्य मागे घेत असल्याची घोषणा केली होती. या युद्धामध्ये ५२७ भारतीयांना प्राण गमवावे लागले, तर पाकिस्तानमधील मृतांचा आकडा ४५० इतका होता.