पीटीआय, जम्मू

जम्मू आणि काश्मीरमधील डोडा जिल्ह्यात लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये सोमवारी रात्री उशिरा झालेल्या चकमकीत एका कॅप्टनसह चार जवान शहीद झाले. कॅप्टन ब्रिजेश थापा, नायक डी. राजेश, जवान ब्रिजेंद्र तसेच अजय अशी शहीद जवानांची नावे आहेत. या चकमकीनंतर परिसरातील शोधमोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे.

Six Naxalites killed in police encounter in Telangana
तेलंगणात पोलीस चकमकीत सहा नक्षलवादी ठार
Who is Jaydeep Apte in Marathi
Jaydeep Apte : जयदीप आपटेला पोलिसांनी हाक मारली, रडत गयावया करु लागला आणि म्हणाला; “मला…”
chhattisgarh police managed to kill 9 Naxalites
छत्तीसगडमधील चकमकीत एका जहाल नेत्यासह ९ नक्षलवादी ठार
Bullock carts and horses also on the road in protest against potholes in Nashik
नाशिकमध्ये खड्ड्यांविरोधातील आंदोलनात बैलगाडी, घोडेही रस्त्यावर
Bangladeshis leave from assam
Assam Tension: बांगलादेशींना आसाम सोडण्यासाठी आठवड्याची मुदत; शिवसागर जिल्ह्यात तणाव
minorities targeted in bjp ruled states deeply troubling congress slams bulldozer action in mp
बुलडोझर न्याय अमान्य! अल्पसंख्याकांना लक्ष्य करणे व्यथित करणारे; घरे पाडणे थांबवण्याची काँग्रेसची मागणी
upper tehsil office, Mohol taluka,
तहसील कार्यालयाच्या वादात शिंदे-अजितदादा गटात जुंपली, भाजपचे ‘नरो वा कुंजरो’
Nagpur white squirrel marathi news
Video: खारुताईच्या पाठीवरील पट्टे झाले बेपत्ता, रंगही झाला पांढरा!

देसा वनक्षेत्रात धारी गोटे उरबागी येथे दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर राष्ट्रीय रायफल्स आणि जम्मू पोलिसांच्या विशेष पथकाने शोधमोहीम (पान ८ वर) (पान १ वरून) सुरु केली. दहशतवाद्यांनी पथकावर गोळीबार करून पळ काढला. दाट झाडी व प्रतिकूल वातावरणात कॅप्टन थापा यांच्या नेतृत्वाखाली जवानांनी त्यांचा पाठलाग केला. यावेळी झालेल्या चकमकीत पाच जवान गंभीर जखमी झाले. त्यातील चौघांना वीरमरण आले. दहशतवादी सीमेपलीकडून आले असून, एक-दोन महिने जंगलात लपून बसल्याची माहिती आहे. किश्तवाड जिल्ह्यालगत घडी भगव जंगलात ९ जुलै रोजी याच दहशतवाद्यांनी हल्ला केल्याची शक्यता आहे.

हेही वाचा >>>मध्य, पश्चिम रेल्वे फलक हटविणार; सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर कार्यवाही

‘दहशतवाद्यांची आधारस्थळे उद्ध्वस्त करा’

शहीद कॅप्टन थापा यांचे वडील कर्नल (निवृत्त) बुवनेश थापा यांनी आपल्या मुलाच्या सर्वोच्च बलिदानाचा अभिमान असल्याची प्रतिक्रिया दिली. त्याच वेळी जम्मू-काश्मीरमधील अतिरेक्यांची आधारस्थळे शोधून नष्ट करावीत, असे आवाहनही त्यांनी सरकारला केले. दहशतवाद्यांना मदत करणारे अनेक लोक आहेत. त्यांचा सर्वांत मोठा धोका असल्याचे कर्नल थापा म्हणाले. त्यांनी स्वत: जम्मू-काश्मीरमध्ये लष्करी सेवा दिली आहे.