पीटीआय, नवी दिल्ली

मुसळधार पावसाने सलग दुसऱ्या दिवशी उत्तर भारताला झोडपून काढले. सर्वाधिक फटका हिमाचल प्रदेशला बसला असून तिथे भूस्खलनामुळे चार जणांचा मृत्यू झाला. बचाव आणि मदत कार्यासाठी चार राज्यांमध्ये राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) ३९ तुकडय़ा तैनात करण्यात आल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वरिष्ठ मंत्री आणि अधिकाऱ्यांशी चर्चा करून उत्तर भारतातील पूरस्थितीचा आढावा घेतला.

Pierre Trudeau and Justin Trudeau vs Indira Gandhi and Pm Narendra Modi
इंदिरा गांधी ते नरेंद्र मोदी; पंतप्रधान ट्रुडो पिता-पुत्रांमुळे भारत-कॅनडात वादाची ठिणगी कशी पडली?
24th October 2024 Horoscopes In Marathi
24 October Horoscope : गुरुपुष्यामृत योग कोणत्या राशींसाठी…
in Karnataka BJP nominated basavaraj bommai son bharat bommai
कर्नाटकात भाजपमध्ये घराणेशाहीला प्राधान्य, येडियुरप्पानंतर बोम्मई पुत्राला उमेदवारी
union home minister amit shah remark india will be naxalism free by march 2026
मार्च २०२६ पर्यंत देश नक्षलवादमुक्त होणार काय? छत्तीसगडमध्ये आक्रमक नक्षलविरोधी कारवायांमुळे गृहमंत्र्यांचे वक्तव्य पुन्हा चर्चेत…
no india pakistan bilateral talks during sco meet says s Jaishankar
पाकिस्तानबरोबर द्विपक्षीय चर्चा नाही : जयशंकर
Prime Minister Narendra Modi will visit Vidarbha for the second time in 15 days
पंतप्रधान १५ दिवसांत दुसऱ्यांदा विदर्भात…बंजारा समाजाची गठ्ठा मतपेढी…
polio cases rising in afganistan
तालिबानने पोलिओ मोहिमेला स्थगिती दिल्याने अफगाणिस्तानमध्ये विनाशकारी परिणाम? नक्की घडतंय तरी काय? भारतावरही परिणाम होणार का?
Israeli PM Netanyahu at UN Shows India map as Blessing
Israeli PM Netanyahu : इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहूंनी UN मध्ये भारताचा नकाशा दाखवला; मध्य-पूर्वेतील संघर्षावर मोठं वक्तव्य

हिमाचलला सर्वाधिक फटका

हिमाचल प्रदेशात सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस झाला. सिमल्यामध्ये भूस्खलनामुळे आणखी चार जणांचा मृत्यू झाला. मुख्यमंत्री सुखिवदर सुखू यांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या दोन दिवसांमध्ये पावसाशी संबंधित घटनांमध्ये १६ ते १७ जणांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत राज्याचे तीन हजार कोटींचे नुकसान झाले आहे. राज्याने गेल्या ५० वर्षांमध्ये इतका सर्वत्र मुसळधार पाऊस पाहिला नव्हता, असे त्यांनी सांगितले.
पावसामुळे सिमला-काल्का महामार्ग बंद झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. एकटय़ा सिमला जिल्ह्यात १२० पेक्षा जास्त रस्ते बंद पडले आहेत, तर ४८४ जलपुरवठा योजनांना फटका बसला. मनालीत अडकलेल्या २० जणांची सुटका करण्यात यश आले, मात्र राज्यात विविध ठिकाणी २०० पेक्षा अधिक लोक अडकून पडले आहेत.

‘एनडीआरएफ’च्या ३९ तुकडय़ा तैनात

मुसळधार पाऊस आणि पूरस्थितीचा सामना करणाऱ्या पंजाब, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि हरयाणामध्ये एनडीआरएफच्या ३९ तुकडय़ा तैनात करण्यात आल्या आहेत.

यमुना धोकादायक पातळीवर

हरियाणातून सोडल्या गेलेल्या पाण्यामुळे यमुना नदीनेही धोक्याची पातळी पार केलेली आहे. शनिवार आणि रविवारी दिल्लीमध्ये १५३ मिमी पावसाची नोंद झाली. इतक्या प्रचंड पावसाला सामोरे जाण्याची आमची तयारी नव्हती, अशी कबुली मुख्यमंत्र्यांनी दिली.

परिस्थितीवर लक्ष..

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वरिष्ठ मंत्री आणि अधिकाऱ्यांशी चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेतला, अशी माहिती पंतप्रधान कार्यालयाने दिली. तर मुसळधार पावसाचा फटका बसलेल्या राज्यांना पीएम केअर निधीमधून अतिरिक्त मदत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सोमवारी केंद्र सरकारकडे केली.

१३ तासांनंतर चौघांची सुटका

मध्य प्रदेशात नर्मदा नदीला पूर आला आहे. जबलपूर जिल्ह्यात भेडाघाटजवळ नदीमधील खडकावर अडकून पडलेल्या चौघांची १३ तासांच्या प्रयत्नांनंतर सुटका करण्यात आली. हे सर्व जण मासेमारी करण्यासाठी गेले होते. मात्र नदीला पूर आल्यामुळे ते तेथील खडकावर अडकून पडले होते.