संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. सोमवारी केंद्र सरकारने लोकसभेत राष्ट्रीय गुन्हे नोंदणी अहवालाचा (NCRB) हवाला देत केंद्रीय कामगार मंत्री भूपेंद्र यादव यांनी सांगितले की, २०१९ ते २०२१ या तीन वर्षांत एकूण १ लाख १२ हजार रोजंदारी करणाऱ्या मजूरांनी आत्महत्या केली आहे. तर याच काळात ६६,९१२ गृहिणी, ५३,६६१ स्वयंरोजगार करणारे लोक, ४३,४२० पगारी नोकरदार आणि ४३,३८५ बेरोजगारांनी आत्महत्या केलेल्या आहेत. याच अहवालाचा हवाला देताना केंद्रीय मंत्री यांनी विद्यार्थी आणि शेतकरी यांच्या आत्महत्येची आकडेवारी देखील लोकसभेत मांडली. २०१९ च्या नंतर भारतासहीत जगभरात कोरोनाचे सावट होते, त्या पार्श्वभूमीवर आत्महत्येचे हे आकडे नक्कीच धक्कादायक असे आहेत.

मागील तीन वर्षात देशभरात ३५,९५० विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेली आहे, तर शेती क्षेत्राशी निगडीत असलेल्या ३१,८३९ शेतमजूरांनी आत्महत्या केली असल्याचेही केंद्रीय मंत्री म्हणाले. ही आकडेवारी २०१९, २०२० आणि २०२१ या तीन वर्षांमधली आहे. लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासांत भूपेंद्र यादव यांनी ही आकडेवारी मांडली.

Sasoon Hospital Pune.
‘GBS’मुळे आणखी एक मृत्यू, पुण्यातील ससून सर्वोपचार रुग्णालयात नोंद; राज्यातील रुग्णसंख्या १२७ वर
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Student Suicide, Online Game, German Language Suicide note ,
‘ऑनलाईन गेम’च्या नादात विद्यार्थिनीची आत्महत्या, दोनदा प्रयत्न फसले, जर्मन भाषेत ‘सुसाईड नोट’ अन्…
Maharashtra tiger deaths
विश्लेषण : वर्षाच्या पहिल्या २२ दिवसांतच ११ वाघांचा मृत्यू… महाराष्ट्रात व्याघ्रसंरक्षणाचे गांभीर्य हरवले आहे का?
Policemans son commits suicide by shooting himself with revolver
पोलिसाच्या मुलाने रिव्हॉल्वरने गोळी झाडून केली आहत्महत्या
Sarang Punekar was a strong supporter of the Ambedkarite movement
Sarang Punekar : सावित्रीबाई फुले विद्यापीठातील उच्चशिक्षित तृतीयपंथीय विद्यार्थी सारंग पुणेकरची आत्महत्या, जयपूरमध्ये संपवलं आयुष्य
Suicide kota
Kota Suicide Case : कोटा येथे पुन्हा आत्महत्या सत्र! २४ तासांत दोघांनी संपवलं आयुष्य; महिन्याभरातील सहावी घटना!
ambulance
शेवटी मृत्यूने गाठलेच! महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न, पण रुग्णवाहिकेतील ‘या’ चुकीमुळे गेला जीव

केंद्रीय मंत्री यांनी ही माहिती देताना सांगितले की, असंघटीत कामगार सामाजिक सुरक्षा अधिनियम, २००८ च्या अनुसार सरकार असंघटीत क्षेत्रातील कामगारांना सामाजिक सुरक्षा देण्यासाठी कटिबद्ध आहे. यामध्ये रोजंदारीवर काम करणारे मजूर देखील येतात. या कायद्यानुसार विम्याचे सरंक्षण, आरोग्याशी संबंधित कल्याणकारी योजना तयार करणे आणि मातृत्वाच्या काळात लाभ देणे, वृद्धावस्थेतील सुरक्षा आणि केंद्र सरकारच्या इतर अनेक योजनांचे लाभ देण्याची तरतूद आहे.

कामगारांसाठी कोणकोणत्या योजना

  • प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY) आणि प्रधानमंत्री सुरक्षा वीमा योजना (PMSBY) च्या अंतर्गत विमा पुरविणे.
  • PMJJBY ही योजना १८ ते ५० वर्ष वयाच्या सर्व लोकांना उपलब्ध आहे. मात्र त्यांच्याजवळ बँकेचे पासबुक किंवा पोस्टाचे खाते असणे आवश्यक आहे. बँकेत थेट पैसे वळते करण्यासाठी खात्याची परवानगी हवी.
  • या योजनेतंर्गत विमा काढलेल्या व्यक्तीचा कोणत्याही कारणासाठी मृत्यू झाल्यास दोन लाखांची भरपाई मिळते. या योजनेसाठी ४३६ रुपयांचा वार्षिक प्रिमियम भरावा लागतो. जो विमा ग्राहकाच्या बँक खात्यातून आपोआप कापून घेतला जातो.
  • ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत या योजनेत १४.८२ कोटी लाभार्थी जोडले गेले आहेत.

Story img Loader