नितीश कुमारांनी बिहारच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्याने बिहारमध्ये मोठा राजकीय भूकंप झाला आहे. नितीश कुमारांनी रविवारी राजभवनात राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांच्याकडे राजीनामा देताना एनडीए सरकार स्थापन करण्याचा दावाही केला. तसंच, भाजपाच्या पाठिंब्याचे पत्रही त्यांनी राज्यपालांना सादर केले. हे पत्र राज्यपालांनी स्वीकारले असून आज सायंकाळी पाच वाजता शपथविधीसाठी आमंत्रित करण्यात आले आहे. भाजपाचे बिहारचे प्रभारी विनोद तावडे यांनी यासंदर्भातील माहिती दिली.

नितीश कुमार यांनी आज सकाळी जनता दल (संयुक्त) विधिमंडळाच्या बैठकीत राजीनामा देण्याचा निर्णय जाहीर केला. या राजीनामा सत्रानंतर भाजपाने आपल्या आमदारांना घेऊन पाठिंब्याचे पत्र दिले. हे पाठिंब्याचे पत्र नितीश कुमारांनी राज्यपालांना सादर केले. यामध्ये एनडीए सरकार स्थापन करण्यास इच्छुक असल्याचं सांगण्यात आलं. हे पत्र राज्यपालांनी स्वीकारलं आहे. त्यामुळे आज पाच वाजता शपथविधी सोहळा होणार आहे.

PM Narendra Modi
“मोदी व न्यायाधीशांना मारण्यासाठी पाण्यात विष…”, पंतप्रधानांचा केजरीवालांच्या ‘त्या’ वक्तव्यावर पलटवार
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Dhananjay Munde Beed Guardian Minister
Dhananjay Munde: “मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा मागितला तर…”, दिल्लीमध्ये भेटीगाठी घेतल्यानंतर धनंजय मुंडे काय म्हणाले?
Bharatshet Gogawale On Sunil Tatkare
Bharatshet Gogawale : पालकमंत्रिपदाचा वाद विकोपाला? “…तर मंत्रिपदाचा राजीनामा देतो”, भरत गोगावलेंचं सुनील तटकरेंना खुलं आव्हान
Prabowo Subianto and Narendra Modi
संचलनात संविधान केंद्रस्थानी; इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे
Uday Samant on Eknath Shinde
Sanjay Raut: “एकनाथ शिंदे आता देवेंद्र फडणवीसांना नकोसे, लवकरच मोदींना…”, संजय राऊत यांचा दावा
guardianship of Washim district was given to Hasan Mushrif from 630 km away Kolhapur
वाशीम जिल्ह्याचे पालकत्व ६३० कि.मी.वर
Anjali Damania Dhananjay Munde
“आता राजीनामा द्यायची तयारी करा”, सहकारी नेत्यांच्या वक्तव्यांचा दाखला देत अंजली दमानियांचा धनंजय मुंडेंना टोला

दरम्यान, सम्राट चौधरी यांची गटनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे, तर विजय सिन्हा यांना उपनेतेपद देण्यात आले आहे. “मला खात्री आहे की पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वाखाली आणि जे. पी. नड्डा यांच्या मार्गदर्शनात दोन्ही नेते बिहारच्या भल्यासाठी काम करतील”, असं विनोद तावडे यांनी म्हटलं. तसंच, नितीशकुमार यांची बिहारमध्ये एनडीएच्या प्रमुखपदीही नियुक्ती करण्यात आली आहे.

हेही वाचा >> राजीनामा देण्याची वेळ का आली? नितीश कुमारांनी मांडली व्यथा; म्हणाले…

दरम्यान, नितीश कुमार मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असून भाजपाकडून दोघांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ दिली जाण्याची शक्यता आहे. याबाबत अद्यापही अधिकृत माहिती आलेली नसून सायंकाळी पाच वाजताच संपूर्ण चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

नितीश कुमारांनी राजीनामा का दिला?

तुमच्यावर मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची परिस्थिती का उद्भवली? असा प्रश्न आज पत्रकारांनी नितीश कुमारांना विचारला. त्यावर नितीश कुमार म्हणाले, राज्यकारभार योग्य रितीने चालत नव्हता, त्यामुळे माझ्यावर राजीनामा देण्याची वेळ आली. तुम्ही पत्रकारांनी मला यापूर्वी अनेकदा विचारल होतं. परंतु, तेव्हा मी बोलणं बंद केलं होतं. आम्ही सर्व परिस्थिती पाहत होतो. त्यानंतर मला लोक वेगवेगळे सल्ले देऊ लागले. मी माझ्या पक्षातील सहकाऱ्यांशी चर्चा केली. त्यांचे वेगवेगळे सल्ले घेतले. त्यानंतर आज राजीनामा दिला आहे आणि आमचं सरकार विसर्जित केलं आहे.

Story img Loader